शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पैसेवारी म्हणते, जिल्ह्यात सुकाळ

By admin | Updated: October 17, 2015 02:49 IST

जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे.

नजरअंदाज पैसेवारी जाहीर : सोयाबीन गेले, कपाशीचे उत्पन्न घटण्याची चिन्हेवर्धा: जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. वास्तवात चित्र मात्र उलट आहे. शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षेनुसार कोणतेही उत्पन्न येण्याची शाश्वती नाही. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या सुधारीत पैसेवारीत तरी हे चित्र पालटेल, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न निघण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या तोंडावर काढण्यात येत असलेल्या सोयाबीनने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. एकरी एक ते दीड पोते उतारी मिळाल्याने लागवडीकरिता लागलेला खर्चही निघताना दिसत नाही. उशिरा पाऊस आल्याने पेरण्या लांबल्या. अशात पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. दरम्यान, पिके मरणासन्न अवस्थेत असताना पाऊस आला. यामुळे पिके वाचली; मात्र पुन्हा मारलेल्या दडीमुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. परिणामी नगदी पीक असलेल्या सोयाबीनने ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला. अशीच अवस्था कपाशीची झाली आहे. कपाशी पात्यांवर असताना आलेल्या पावसामुळे पात्या गळाल्या. यानंतर पुन्हा पाऊस आला नाही. यामुळे गत महिन्यात आलेला पाऊस कपाशीकरिता तारक ठरणार असे म्हणताना तो मारक ठरला. आज कपाशीची अवस्था बिकट आहे. जमिनीतील उष्णतेमुळे झाडे करपत आहेत. सोबतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव आहेतच. यामुळे कपाशीकडूनही शेतकऱ्यांना आता विशेष आशा राहिल्या नाहीत. असे असताना जिल्ह्यात ५० च्या वर निघालेली पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी अशीच आहे. यावर मार्ग काढण्याकरिता जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग राबविण्याची मागणी काही शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. यात जर जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत आली तर शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपे होईल. यामुळे सुधारीत पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस तरीही जमिनी कोरड्याचजिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे भरले असले तरी जमिनीची धूप शांत झाली नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पामध्ये विक्रमी जलसाठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तरी शेतीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात ६६.६४ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद गत वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा पाऊस अधिक असला तरी तो पिकांकरिता लाभदायक नसल्याने दिसून आले आहे. या पावसामुळे जमिनची धूप शांत झाली नसल्याने उष्णतेमुळे पिकांची स्थिती दयनिय झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने तापमाणामुळे पीक करपत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनला एकरी दीड पोत्यांचा उतारा जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मध्यंतरी सोयाबीनची स्थिती पाहून चांगले उत्पन्न होईल, असे वाटत होते. पीक पाहून शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र मध्यंतरी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेंगा भरल्या नसल्याने उत्पन्न हातचे गेल्याचे दिसून आले आहे. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीचे पिकही हातेचे जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अशी स्थिती असताना शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यात नुकसान नसल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.