शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

आठ दिवसात मोबदला द्या, अन्यथा पाणी बंद

By admin | Updated: April 18, 2015 01:51 IST

टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.

कारंजा (घा.) : टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेतील पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकरिता जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अधिग्रहीत जमिनीचा मोबादला देण्यात आलेला नाही. त्यामुळे आठ दिवसात हा मोबदला देण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९१ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. आज त्याला २३ वर्षे लोटूनही या मोबदल्याकरिता गावाकऱ्यांना उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाला शुक्रवारी पत्र देत आठ दिवसात व्याजासह मोबदला द्या अन्यथा पाणी बंद करू असा इशारा पत्राद्वारे दिला आहे. नारा अधिक २२ गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता पंढरी लहानु बोडखे, रा. बिहाडी यांच्या शेत सर्व्हे नं.३३३ मध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची समतोल टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारले. यातुन २२ गावांच्या पाण्याची समस्या सुटली. या प्रकल्पाकरिता जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोबदल्याकरिता प्राधिकरणाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मोबदल्याची रक्कम आल्याचे सांगण्यात येते मात्र ती दिल्या जात नाही. अखेर त्रस्त शेतकऱ्यांने आठ दिवसात व्याजासह मोबदला मिळण्याबाबत उपकार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष पुरवून त्वरित मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)