शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:46 IST

जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी.

ठळक मुद्देअजय गुल्हाणे : ‘स्वच्छता ही सेवा’ जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी. असे झाल्यास स्वच्छता ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ होईल. शिवाय आरोग्यदायी समाजाची निर्मिती होईल. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व.) शालिक मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, कार्यकारी अभियंता (लघुसिंचन) एच. पी. गहलोत, शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. आर. मेश्राम, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, कार्यकारी अभियंता (बांध.) ए. पी. तेलंग, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वाल्मिक इंगोले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.अजय गुल्हाणे पुढे म्हणाले, संपूर्ण गांधी जिल्हा हा स्वच्छ करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी वर्धेकरांची आम्हाला साथ आवश्यक आहे. कुठलाही शासकीय उपक्रम लोकसहभागाशिवाय पूर्णत्त्वास जात नाही. शिवाय हे अभियान महत्त्वाकांशी असल्याने गावागावात नेमणूक केलेल्या संपर्क अधिकाºयांनी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्येक्ष गावात जाऊन अभियानाबाबत दिलेल्या सुचना नुसार कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले.मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात जिल्ह्यातील संवादकांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशन व्दारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी महेश डोईजोड, कैलास बाळबुधे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांनी केले. संचालन विनोद खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला संपदा बोधनकर, अशोक रत्नपारखी, अंकुर पोहाणे, नरेंद्र येनोरकर, राहुल चावके, मनोज डेकाटे, नितिन कांबळे, गणेश सुरकार, किशोर तराळे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान