शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

अर्धवट मोजणी; भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची सावरासावर

By admin | Updated: March 20, 2015 01:47 IST

शेतकऱ्यांना मंदिराकरिता दान द्यावयाच्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवटच केली़ ...

वर्धा : शेतकऱ्यांना मंदिराकरिता दान द्यावयाच्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवटच केली़ याबाबतच्या तक्रारीनंतर पुन्हा मोजणीचा फार्स झाला; पण ती पूर्ण करून देण्यात आली नाही़ आता अधिकारी, कर्मचारी सावरासावर करीत असून कर्मचाऱ्यांची पाठराखन केली जात असल्याचे दिसते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ सरूळ येथील शेतातील प्लॉट क्र. ०३ आर सर्व्हे क्र. १६५ हा प्लॉट बळीराम गावंडे यांचा आहे़ सध्या तेथे जनावरे बांधली जातात़ सदर जागा विठ्ठल-रूख्मिनी मंदिर बांधण्यासाठी देण्याचा निश्चय शेतकऱ्याने केला आहे़ यासाठी पूर्ण मोजमाप करून सदर जमीन मंदिराला दान करावी म्हणून त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय देवळी येथे रितसर अर्ज केला़ शासन नियमानुसार शुल्कही अदा केले. यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातून एन.सी. जाधव हे प्लॉट मोजणी करून देण्यासाठी आले़ त्यांनी अर्धवट मोजणी केली व शेतकऱ्याच्या सह्या घेतल्या़ उर्वरित मोजणी गुरूवारी केली जाईल, असे सांगून अधिकारी गेले ते परतलेच नाही़ भमणध्वनीवर संपर्क साधला असता मोजणी करून देण्यास नकार देऊन शिवीगाळही करण्यात आली़ याबाबत शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; पण उपयोग झाला नाही़ यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पुन्हा अधिकारी आले; पण व्यवस्थित मोजणी केली नाही़ यात अधिकारीही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असून कारवाईची माणगी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)भूमी अभिलेख कर्मचाऱ्याने अर्धवट मोजणी केली; पण सदर मोजणी व्यवस्थित असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. पाहणी करण्यासाठी कराड यांना पाठविण्यात आले असता त्यांनीही कर्मचाऱ्यांची बाजू राखण्याचाच प्रयत्न केला़ सदर जागा मंदिरासाठी दान देत असल्याने मोजणी न झाल्यास भूमी अभिलेख वर्धा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी गावंडेसह ग्रामस्थांनी दिला आहे़ पाहणी करूनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ शेतकऱ्याची कुचंबनाशेतकऱ्याने तक्रार केल्यानंतरही अधिकाऱ्यांना जाग आली नाही; पण लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वर्धा यांनी सोमवारी उपअधीक्षक भूमी अभिलेख देवळी यांना घटना स्थळावर चौकशीसाठी पाठविले़ यावरून जे.बी. कराड यांनी जागेची पाहणी केली़ यावेळी त्यांनी मोजणी केली आहे व व्यवस्थित केली आहे, तुमच्या जागेतच तफावत असल्याचे सांगण्यात आले. यावरून उपअधीक्षक भूमी अभिलेख कराडे हे कर्मचारी जाधव यांना पाठीशी घालत असून शेतकऱ्याची कुचंबना झाली आहे़जाधव यांनी अर्धवट मोजणी केली असताना अधिकारी व्यवस्थित मोजणी केल्याचे सांगत आहेत़ यावरून अधिकारीही कर्मचाऱ्यांची पाठराखन करीत असल्याचे दिसते़ सदर जमिनीची त्वरित मोजणी करून द्यावी, अशी मागणी बळीराम गावंडे, मुकेश गावंडे, निलेश रानोटे, राजेंद्र सावरकर, महेंद्र गावंडे, वसंत रानोटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़