शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहनतळाची वानवा

By admin | Updated: March 1, 2017 00:58 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

वाहतुकीचा बट्ट्याबोळ : बजाज चौकातही ‘ट्रीपल सीट’चा प्रवास वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या बजाज चौकातूनही दुचाकींवर ‘ट्रीपल सिट’चा प्रवास होताना दिसतो. शिवाय शहरात वाहनतळाची वानवा असल्याने रस्त्यावरच वाहने ‘पार्क’ केली जात असल्याचे चित्र आहे. नगर पालिका व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. शिवाय शहरात वाहनांसाठी पार्किंग झोन निर्माण करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाला पार पाडावी लागते; पण दोन्ही यंत्रणांना जबाबदारीचा विसर पडल्याचेच सध्या दिसून येत आहे. बजाज चौकात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची व्यवस्था करण्यात आली आहे; पण ती अत्यंत तोकडी आहे. शिवाय ही व्यवस्था केवळ भाजी बाजार वा बस स्थानकावर जाणाऱ्या वाहनधारकांच्या उपयोगाची आहे. बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. मुख्य मार्गावरही वाहने कुठे ठेवावी, हा प्रश्न निर्माण होतो. आर्वी नाका चौकासह मुख्य मार्ग, बॅचलर रोड व अन्य मार्गांवरही वाहने रस्त्याच्या कडेला तथा कधी रस्त्यावरच पार्क करावी लागतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांचे सध्या या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) भरधाव दुचाकी ठरताहेत अपघातास कारण शहरातील मुख्य मार्गासह अन्य मार्गांवरही दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांत तर बजाज चौक या मुख्य ठिकाणीही दुचाकींवर ट्रीपल सिट बसवून वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. मंगळवारी भर दुपारीच बजाज चौकातून विद्यार्थी, युवक दुचाकीवर ट्रीपल सिट जाताना दिसून आले. मंगळवारी बजाज चौक परिसरात एकही वाहतूक पोलीस दिसत नव्हता. याचाच फायदा हे दुचाकी चालक घेत असावेत. शहराच्या अन्य भागातही दुचाकीवरून तिघे जातानाचे चित्र नित्याचे झाले आहे. शिवाय भरधाव दुचाकींमुळे मुख्य मार्गावरील अपघात नित्याचेच झाले आहेत. परिणामी, वृद्ध, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.