शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

देशभक्त, संपूर्ण स्वदेशी जीवन व कार्याचा अनोखा संगम असलेले पं.परचुरे शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:13 IST

देशभक्त, वेदशास्त्रसंपन्न,लेखक आणि महात्मा गांधीजींचा शिपाई अशी खरी ओळख असणारे म्हणजे पं. दत्तात्रेय वासुदेव परचुरे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशभक्त, वेदशास्त्रसंपन्न,लेखक आणि महात्मा गांधीजींचा शिपाई अशी खरी ओळख असणारे म्हणजे पं. दत्तात्रेय वासुदेव परचुरे. पण त्यांची ओळख मात्र कुष्ठरोगी परचुरे शास्त्री अशीच समाजात निर्माण झाली. स्वदेशी चळवळ आणि देशभक्ती ओतपोत भरलेल्या शास्त्रीजींचे जीवन सदैव उपेक्षित असेच राहिले असले तरी गांधीजींच्या सेवेमुळे ते सदैव लोकांच्या स्मरणात राहिले. अशा महान वेदशास्त्रीचा ५ सप्टेंबर हा स्मृृतीदिन. त्यांचे स्मरण युवकांना होणे आवश्यक आहे.प्रत्येक व्यक्तीला चरित्र व चारित्र्य असते तसेच पं.परचुरे शास्त्री यांनाही होते. ते वेदाचे व संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. पण ते पुराणात अडकले नाहीत. बुरसटलेल्या विचारांना थारा न देता स्वातंत्र चळवळ, सत्याग्रह आणि रचनात्मक कार्याला प्राधान्याने महत्त्व देऊन कार्य केले. यासाठी त्यांनी वैयक्तिक सुखाचा त्यागही केला. गांधीजींच्या कामाला स्वत:ला वाहून घेतले ते अखेरपर्यंत. यात त्यांच्या पत्नीने त्यांना उत्तम साथ दिली. ज्ञानी व्यक्ती अन्यायाचा विरोध करतो. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी वाई येथील प्राज्ञ शाळेच्या माध्यमातून विद्यादानाचे कार्य सुरू केले. घर खर्चासाठी ते मानधन घेत असत. आपल्या पत्नीसह मुळशी आणि कोयना धरणाच्या विरोधी सत्याग्रहात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांचा विवेकशून्य विकासाला विरोध होता. खेड्यातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी रचनात्मक कार्याचा विचार पोचविण्याचे कार्य केले. यामुळे त्यांना ग्रामसेवक परचुरे शास्त्री या नावाची नवीन ओळख निर्माण झाली. देशातील शेतकरी निर्भय आणि निर्व्यसनी बनणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते.कुष्ठरोग होण्याच्या पूर्वी त्यांनी तुरूंगवास ही भोगला होता. कुष्ठरोग झाल्यावर ते मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. तुरूंगवासात ते महारोगी वार्डात राहिले. सूतकताई हा त्यांच्या जीवनातील दैनिक भाग झाला होता. ग्रामोद्योग व स्वालंबन यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. गांधीजींचे कार्यच देशाला मारणारे आहे यावर विश्र्वास होता. यामुळेच कुषठरोग होऊनही ते थकले वा उन्मळून पडले नाही. तुरूंगात रविंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट झाली. कुटुंबांनी त्यांना अव्हेरले पण मित्र आणि गांधीजींचा सहयोग व प्रेम कायम मिळत राहिले. समाजातील सर्वच लोकं वाईट नसतात हे अनेक उदाहरणाने दिसून आले.गांधीजींना आश्रमच्या बाहेर जाणे आवश्यक असल्याने त्यांची व्यवस्था दत्तपूर येथे मनोहर दिवान यांच्यावर सोपवली. येथेच त्यांची ५ सप्टेंबर १९४५ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी प्राणज्योत मावळली. मनोहर दिवानी यांनी अग्नी दिला. कुटुंबातील कुणीच उपस्थित नव्हते. होते फक्त आचार्य विनोबा भावे आणि सहकारी. महारोगाने ते पिडीत नसते तर या महाराष्ट्रात त्यांची एक वेगळी ओळख नक्कीच असते. अशा अनामिक व उपेक्षित समाजाच्या बळी ठरलेल्या पं.परचुरे शास्त्रीजींचे स्मरण करून श्रद्धांजली वाहणे आपले कर्तव्य आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम