शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

जिल्ह्यातील जलाशय आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपाणी साठ्यात होतेय घट : चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प झालेय कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पच यंदा आॅक्सिजनवर असून समाधानकारक पाऊस न झाल्यास वर्धा जिल्ह्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.पावसाने दगा दिल्याने यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांचेही बजट विस्कळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्याने तसेच सिंचनासाठी पाणीच मिळणार नसल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनीही विविध उन्हाळी पीक घेण्याचे टाळले आहे. ज्यांच्या शेतात विहीर व विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे अशाच शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पीक घेण्याचा धाडस केला.तर घराच्या आवारात असलेल्या विहिरींनीही तळ गाठल्याने शिवाय कमी खोलीच्या कुपनलीकाही कोरड्या झाल्याने नागरिकांनीही मोठा आर्थिक खर्च सोसून नवीन बोअरबेल केल्या आहेत. तर ज्यांची बोअरवेल करण्याची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांना सध्या शेजारच्याकडून उसणवारीवर पाणी घेऊन गरज भागविली जात आहे.पंचधारा, मदन, मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प हे मध्यम प्रकल्प तर परसोडी व टाकळी बोरखेडी हे लघु प्रकल्प सध्या कोरडे झाले आहेत. तर उर्वरित १८ लघु प्रकल्पात १ दलघमीपेक्षाही कमी उपयुक्त जलसाठा सध्या आहे. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे तो झपाट्याने घटण्याची शक्यता आहे. वर्धा शहर आणि परिसरातील १३ गावांमधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी फायद्याचा ठरणाºया धाम प्रकल्पात सध्या ६.२७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे जोरदार पाऊस येईपर्यंत तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही सर्व स्तरातून केले जात आहे.अधिकाऱ्यांनी केली ‘धाम’ची पाहणीयंदा महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाणी पातळी सर्वाधिक खालविल्याने व धामच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होत भविष्यातील जलसंकटावर मात करता यावी या उद्देशाने यंदा धाम गाळमुक्त करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठकही बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासोद, महाकाळी हे गाव गाठून धाम प्रकल्पातून सुमारे किती गाळ काढता येईल याबाबत पाहणी केली.

टॅग्स :Damधरण