शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जलाशय आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपाणी साठ्यात होतेय घट : चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प झालेय कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पच यंदा आॅक्सिजनवर असून समाधानकारक पाऊस न झाल्यास वर्धा जिल्ह्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.पावसाने दगा दिल्याने यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांचेही बजट विस्कळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्याने तसेच सिंचनासाठी पाणीच मिळणार नसल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनीही विविध उन्हाळी पीक घेण्याचे टाळले आहे. ज्यांच्या शेतात विहीर व विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे अशाच शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पीक घेण्याचा धाडस केला.तर घराच्या आवारात असलेल्या विहिरींनीही तळ गाठल्याने शिवाय कमी खोलीच्या कुपनलीकाही कोरड्या झाल्याने नागरिकांनीही मोठा आर्थिक खर्च सोसून नवीन बोअरबेल केल्या आहेत. तर ज्यांची बोअरवेल करण्याची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांना सध्या शेजारच्याकडून उसणवारीवर पाणी घेऊन गरज भागविली जात आहे.पंचधारा, मदन, मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प हे मध्यम प्रकल्प तर परसोडी व टाकळी बोरखेडी हे लघु प्रकल्प सध्या कोरडे झाले आहेत. तर उर्वरित १८ लघु प्रकल्पात १ दलघमीपेक्षाही कमी उपयुक्त जलसाठा सध्या आहे. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे तो झपाट्याने घटण्याची शक्यता आहे. वर्धा शहर आणि परिसरातील १३ गावांमधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी फायद्याचा ठरणाºया धाम प्रकल्पात सध्या ६.२७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे जोरदार पाऊस येईपर्यंत तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही सर्व स्तरातून केले जात आहे.अधिकाऱ्यांनी केली ‘धाम’ची पाहणीयंदा महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाणी पातळी सर्वाधिक खालविल्याने व धामच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होत भविष्यातील जलसंकटावर मात करता यावी या उद्देशाने यंदा धाम गाळमुक्त करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठकही बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासोद, महाकाळी हे गाव गाठून धाम प्रकल्पातून सुमारे किती गाळ काढता येईल याबाबत पाहणी केली.

टॅग्स :Damधरण