शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

जिल्ह्यातील जलाशय आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपाणी साठ्यात होतेय घट : चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प झालेय कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पच यंदा आॅक्सिजनवर असून समाधानकारक पाऊस न झाल्यास वर्धा जिल्ह्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.पावसाने दगा दिल्याने यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांचेही बजट विस्कळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्याने तसेच सिंचनासाठी पाणीच मिळणार नसल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनीही विविध उन्हाळी पीक घेण्याचे टाळले आहे. ज्यांच्या शेतात विहीर व विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे अशाच शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पीक घेण्याचा धाडस केला.तर घराच्या आवारात असलेल्या विहिरींनीही तळ गाठल्याने शिवाय कमी खोलीच्या कुपनलीकाही कोरड्या झाल्याने नागरिकांनीही मोठा आर्थिक खर्च सोसून नवीन बोअरबेल केल्या आहेत. तर ज्यांची बोअरवेल करण्याची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांना सध्या शेजारच्याकडून उसणवारीवर पाणी घेऊन गरज भागविली जात आहे.पंचधारा, मदन, मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प हे मध्यम प्रकल्प तर परसोडी व टाकळी बोरखेडी हे लघु प्रकल्प सध्या कोरडे झाले आहेत. तर उर्वरित १८ लघु प्रकल्पात १ दलघमीपेक्षाही कमी उपयुक्त जलसाठा सध्या आहे. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे तो झपाट्याने घटण्याची शक्यता आहे. वर्धा शहर आणि परिसरातील १३ गावांमधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी फायद्याचा ठरणाºया धाम प्रकल्पात सध्या ६.२७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे जोरदार पाऊस येईपर्यंत तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही सर्व स्तरातून केले जात आहे.अधिकाऱ्यांनी केली ‘धाम’ची पाहणीयंदा महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाणी पातळी सर्वाधिक खालविल्याने व धामच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होत भविष्यातील जलसंकटावर मात करता यावी या उद्देशाने यंदा धाम गाळमुक्त करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठकही बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासोद, महाकाळी हे गाव गाठून धाम प्रकल्पातून सुमारे किती गाळ काढता येईल याबाबत पाहणी केली.

टॅग्स :Damधरण