शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कृषी विभागाचा बंधारा गाळानेच ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:56 PM

भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : शेतकरी सिंचनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.कारंजा तालुक्यातील धर्ती गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या मौजा भालू शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर कृषी विभागाच्या वतीने रूपचंद मानमोडे यांच्या शेताजवळ १० वर्षाआधी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी सिंचनासाठी केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली. परंतु, मागील पाच वर्षांपासून या बंधाऱ्यातील गाळ न उपसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होत नाही. पाणी पूर्णत: वाहून गेल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे.शासनाच्या जलयुक्त शिवारअंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले. परंतु, या नाल्याचे काम करण्यात आलेले नाही. या बंधाऱ्यातील गाळ काठापर्यंत भरलेला असूनही याकडे कुणाचेही लक्ष नाही.शासन पाणी अडविण्यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना हा भाग अपवाद कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढून नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.पाणीसंचयात बाधाशेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. परंतु संबंधितांकडून नाल्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने बंधारे गाळयुक्त होत असून शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागत आहे.या बंधाऱ्यांच्या निर्मितीमुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. परंतु, बंधारा गाळाने भरल्यामुळे पाणी अडल्या जात नाही. त्यामुळे विहिरींची पातळी खालावली आहे. बंधाऱ्यांतील गाळ उपसण्यात यावा.- रूपंचद मानमोडे, शेतकरी, धर्ती.