शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आमची शेती पोखरली; त्यांना माफी कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:47 IST

'या' गौणखनिज चोरणाऱ्या कंपनीचा दंड माफ करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 

वर्धा : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता कंत्राटदार कंपनीवर शासनाची सुरुवातीपासूनच कृपादृष्टी राहिली आहे. याचाच फायदा घेत कंत्राटदार कंपनीने महामार्गाच्या कामाकरिता वर्धा जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन अवैधरीत्या पोखरून काढली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनच नाही, तर न्यायालयापर्यंत धाव घेतल्यावर कंत्राटदार कंपनीला कोट्यवधीचा दंड ठोठावून गुन्हेही दाखल केले; परंतु, आता या गौणखनिज चोरणाऱ्या कंपनीचा दंड माफ करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 

 नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम ॲफकॉन्स या कंत्राटदार कंपनीला देण्यात आले.  या महामार्गाकरिता मोठमोठ्या टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. शासनाने या महामार्गाच्या कामाकरिता वापरण्यात येणाऱ्या गौणखनिजांवरील स्वामित्वधन अर्थात रॉयल्टीला सूट देऊन कंत्राटदाराला मालामाल करीत शासनाची तिजोरी खाली केली. शासनाचेच पाठबळ मिळाल्याने या कंपनीने मोठ्या प्रमाणात गौणखनिजांचा अवैधरीत्या उपसा चालविला. यादरम्यान नागपूरपासून तर मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी शेती पोखरून गौणखनिज चोरल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर कंत्राटदार कंपनीवर दोनशे कोटींपेक्षा अधिक दंड आकारण्यात आला होता.    दरम्यानच्या काळात सरकार बदलल्याने गौणखनिज उत्खननाबाबत स्वामित्वधन भरण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच कंपनीला दंडही भरावा लागणार होता. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्याने त्यांनी पुन्हा कंत्राटदार कंपनीची पाठराखण करीत आकारलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वर्धा जिल्ह्यात ३ लाख ब्रासच्यावर अवैध उत्खनन - ॲफकॉन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीने वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांतील काही परिसरात शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता व माहिती न देता अवैधरीत्या जवळपास तीन लाख ब्रासच्यावर अवैधरीत्या उत्खनन केल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले. - सेलू तालुक्यातील केळझर परिसरातील कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीवरील विनापरवानगी तीन लाख ब्रास मुरूम व दगड काढून नेल्याचे निदर्शनास आले. - यासोबतच खापरी, कोटंबा, गणेशपूर, विरुळ आदी गावांतही मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करून २३८ लाख ९९ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता हा दंड माफ करणे म्हणजे सत्तेचा गैरवापर ठरेल, असा आरोप शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी