शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

९७ हजार बालकांना देणार ‘ओआरएस’ व ‘झिंक टॅब्लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:58 IST

आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे.

ठळक मुद्देघरोघरी व अंगणवाडीत वितरण : विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या ९७ हजार ३२५ बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र तथा घरोघरी जाऊन ओआरएस व झिंक टॅबलेटचे वितरण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व परिचारिकांद्वारे मंगळवारपासून या अभियानास जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८१ उपकेंद्र असून ९१५ गावांत १ हजार ४ आशा स्वयंसेविका ९७ हजार ३२५ बालकांना घरोघरी जाऊन तथा आरोग्य केंद्र, उपकंद्रांतून ओआरएस व झिंक टॅबलेट देणार आहे. यातील शहरी भागाची लोकसंख्या २ लाख ९३ हजार ३८० असून शून्य ते पाच वर्षे वयाची बालके असलेल्या कुटुंबांची संख्या १९ हजार ५६२ आहे. या कुटुंबांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयाची २५ हजार ८३५ बालके आहेत. या शहरी क्षेत्रात येणाºया बालकांना १३७ अंगणवाडी सेविका व २७ परिचारिकांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये ओआरएसचे पॅकेट व झिंक टॅबलेट देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य रुग्णालय व जि.प. आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या मोहिमेत अतिसाराची लागण झालेल्या बालकांवर उपचार केले जाणार आहेत. यात क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस व १४ दिवसपर्यंत झिंकच्या गोळ्या देण्यात येणार आहे. २ ते ६ महिन्यांपर्यंतच्या बालकांना झिंकची अर्धी गोळी मातेच्या दुधामध्ये विरघळून द्यायची आहे. ६ महिन्यांच्या वरील बालकांना या झिंकच्या गोळ्या ओरआरएसच्या द्रावणातून देता येतात. शिवाय बालके खाऊ शकत असल्यास ही गोळी चघळूनही खाता येत असल्याचे आरोगय विभागाद्वारे सांगण्यात आले.अतिसाराने दगावतात दहा टक्के बालकेचिमुकल्यांना अतिसाराची लागण झाल्यास ती त्यांच्या जीवावर बेतणारी ठरते. लोकसंख्येच्या दहा टक्के शून्य ते पाच वर्षे वयाची बालके आढळतात. यातील दहा टक्के बालकांना अतिसाराची हमखास लागण होत असल्याचे आतापर्यंतच्या नोंदींतून आढळून येते. एकूण बालकांच्या दहा टक्के बालके ही अतिसाराने दगावत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे या वयोगटातील बालकांना अतिसाराची लागण झाल्यास त्वरित उपचार करणेच गरजेचे असते.समज, गैरसमजही अधिकनागरिकांमध्ये बालकांना होणाºया आजारांबाबत अनेक समज, गैरसमज आढळून येतात. हे गैरसमज दूर करणे गरजेचे झाले आहे. बाळांना दात निघत असताना हगवण लागते, हसा समज आहे. हा गैरसमज आहे. वास्तविक, दात निघत असताना चिमुकल्यांना काहीतरी खावेसे वाटते. यामुळे ते काहीही तोंडात घालतात. यातून इन्फेक्शन होत असल्याने आजाराची लागण होते. यावर घरगुती कुठलेही इलाज न करता ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वा खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.आरोग्य केंद्रात अभियानाचा शुभारंभआंजी (मोठी) - आरोग्य विभागाकडून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविला जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या पंधरवड्याचे उद्घाटन मंगळवारी जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादुरे, डॉ. मोडक उपस्थित होते.यावेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्या कशा पद्धतीने द्यायच्या, याचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. सभापती गफाट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ओआरएसचे द्रावण पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जी.पी. पवार, पी.टी. काळे, प्रणाली चौधरी, शंभरकर, लोखंडे, आरोग्य कर्मचारी तथा आशा गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पालकांनी पाच वर्षेपर्यंतच्या बालकांचे अतिसारापासून रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.अतिसारावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ओआरएसचे पॅकेट आणि झिंक टॅबलेट देण्यात येत आहे. ही मोहीम सध्या अंगणवाडी केद्रांतून राबविली जात आहे.- डॉ. एन.बी. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस हे अतिसारावरील गुणकारक औषध आहे. मागील १०-२० वर्षांत झालेल्या संशोधनापैकी ओआरएस हे एक महत्त्वाचे संशोधन मानले गेले आहे. ओआरएसमुळे असंख्य बालकांचे आजपर्यंत प्राण वाचविता आले आहे. यामुळे ५ वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या पालकांनी या अभियानाचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.