शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

९७ हजार बालकांना देणार ‘ओआरएस’ व ‘झिंक टॅब्लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:58 IST

आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे.

ठळक मुद्देघरोघरी व अंगणवाडीत वितरण : विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या ९७ हजार ३२५ बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र तथा घरोघरी जाऊन ओआरएस व झिंक टॅबलेटचे वितरण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व परिचारिकांद्वारे मंगळवारपासून या अभियानास जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८१ उपकेंद्र असून ९१५ गावांत १ हजार ४ आशा स्वयंसेविका ९७ हजार ३२५ बालकांना घरोघरी जाऊन तथा आरोग्य केंद्र, उपकंद्रांतून ओआरएस व झिंक टॅबलेट देणार आहे. यातील शहरी भागाची लोकसंख्या २ लाख ९३ हजार ३८० असून शून्य ते पाच वर्षे वयाची बालके असलेल्या कुटुंबांची संख्या १९ हजार ५६२ आहे. या कुटुंबांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयाची २५ हजार ८३५ बालके आहेत. या शहरी क्षेत्रात येणाºया बालकांना १३७ अंगणवाडी सेविका व २७ परिचारिकांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये ओआरएसचे पॅकेट व झिंक टॅबलेट देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य रुग्णालय व जि.प. आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या मोहिमेत अतिसाराची लागण झालेल्या बालकांवर उपचार केले जाणार आहेत. यात क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस व १४ दिवसपर्यंत झिंकच्या गोळ्या देण्यात येणार आहे. २ ते ६ महिन्यांपर्यंतच्या बालकांना झिंकची अर्धी गोळी मातेच्या दुधामध्ये विरघळून द्यायची आहे. ६ महिन्यांच्या वरील बालकांना या झिंकच्या गोळ्या ओरआरएसच्या द्रावणातून देता येतात. शिवाय बालके खाऊ शकत असल्यास ही गोळी चघळूनही खाता येत असल्याचे आरोगय विभागाद्वारे सांगण्यात आले.अतिसाराने दगावतात दहा टक्के बालकेचिमुकल्यांना अतिसाराची लागण झाल्यास ती त्यांच्या जीवावर बेतणारी ठरते. लोकसंख्येच्या दहा टक्के शून्य ते पाच वर्षे वयाची बालके आढळतात. यातील दहा टक्के बालकांना अतिसाराची हमखास लागण होत असल्याचे आतापर्यंतच्या नोंदींतून आढळून येते. एकूण बालकांच्या दहा टक्के बालके ही अतिसाराने दगावत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे या वयोगटातील बालकांना अतिसाराची लागण झाल्यास त्वरित उपचार करणेच गरजेचे असते.समज, गैरसमजही अधिकनागरिकांमध्ये बालकांना होणाºया आजारांबाबत अनेक समज, गैरसमज आढळून येतात. हे गैरसमज दूर करणे गरजेचे झाले आहे. बाळांना दात निघत असताना हगवण लागते, हसा समज आहे. हा गैरसमज आहे. वास्तविक, दात निघत असताना चिमुकल्यांना काहीतरी खावेसे वाटते. यामुळे ते काहीही तोंडात घालतात. यातून इन्फेक्शन होत असल्याने आजाराची लागण होते. यावर घरगुती कुठलेही इलाज न करता ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वा खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.आरोग्य केंद्रात अभियानाचा शुभारंभआंजी (मोठी) - आरोग्य विभागाकडून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविला जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या पंधरवड्याचे उद्घाटन मंगळवारी जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादुरे, डॉ. मोडक उपस्थित होते.यावेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्या कशा पद्धतीने द्यायच्या, याचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. सभापती गफाट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ओआरएसचे द्रावण पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जी.पी. पवार, पी.टी. काळे, प्रणाली चौधरी, शंभरकर, लोखंडे, आरोग्य कर्मचारी तथा आशा गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पालकांनी पाच वर्षेपर्यंतच्या बालकांचे अतिसारापासून रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.अतिसारावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ओआरएसचे पॅकेट आणि झिंक टॅबलेट देण्यात येत आहे. ही मोहीम सध्या अंगणवाडी केद्रांतून राबविली जात आहे.- डॉ. एन.बी. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस हे अतिसारावरील गुणकारक औषध आहे. मागील १०-२० वर्षांत झालेल्या संशोधनापैकी ओआरएस हे एक महत्त्वाचे संशोधन मानले गेले आहे. ओआरएसमुळे असंख्य बालकांचे आजपर्यंत प्राण वाचविता आले आहे. यामुळे ५ वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या पालकांनी या अभियानाचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.