शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील पाण्यात एडीसची उत्पत्ती

By admin | Updated: September 24, 2014 23:38 IST

शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक

१०० टक्के डास उत्पत्ती : विद्यार्थ्यांनाच झाली अधिक लागणकिरण उपाध्ये - पुलगावशहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक तज्ञांची चमूही दाखल झाली़ यात शाळांतील पाण्यामध्येच डेंग्यूच्या ‘एडीस’ची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे़ यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नको, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे़ वैद्यकीय पथकाद्वारे दोन दिवस शाळा, महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली़ यात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ मांडल्याचे भयावह चित्र समोर झाले. विशेष म्हणजे चांगल्या व नामांकित शाळांचीही जीवघेणी अवस्था आहे. येथील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी (लारवा) व डेंग्यूचे डास आढळून आले़ अस्वच्छ टाकीतील शेवाळयुक्त पाणी नळाद्वारे विद्यार्थ्यांना प्यावे लागत असल्याची विदारक स्थितीही समोर आली़ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सोमवारी (दि़२२) शाळांत मुख्याध्यापकांची बैठक बोलवून शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पाळा, स्वच्छता राखा अन्यथा शाळांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली. दहा दिवसांत रुग्णालयात १८०० रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली़ यातील केवळ ३ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळले़ ५५० रुग्णांच्या प्लेटलेट तपासल्या़ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारीही १८५ रुग्णांची खास चाचणी करण्यात आली़ यात १४५ जणांची मलेरिया चाचणी घेतली; पण डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले नसल्याची माहिती आहे़ प्रौढांपेक्षा लहान मुले व नामांकित शाळांतील दहा वर्षे वयोगटाच्या आतील मुलेच अधिक आजारी पडत असल्याने तपासणीचा मोर्चा शाळांकडे वळविण्यात आला़ यात शैक्षणिक संस्थांची स्वच्छतेबद्दल उदासिनता उघड झाली़ आरोग्य विभाग, नगरपरिषद, लॉयन्स क्लब, समाजसेवी संस्था, नगरसेवक, विद्यार्थी शहरात स्वच्छता अभियान राबवित असून जनजागृती करीत आहेत़ शाळांमध्येच डेंग्यूचा अधिक धोका असल्याने पालक मात्र मुलांना शाळेत पाठवित नसल्याचेच दिसते़