शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळांतील पाण्यात एडीसची उत्पत्ती

By admin | Updated: September 24, 2014 23:38 IST

शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक

१०० टक्के डास उत्पत्ती : विद्यार्थ्यांनाच झाली अधिक लागणकिरण उपाध्ये - पुलगावशहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक तज्ञांची चमूही दाखल झाली़ यात शाळांतील पाण्यामध्येच डेंग्यूच्या ‘एडीस’ची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे़ यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नको, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे़ वैद्यकीय पथकाद्वारे दोन दिवस शाळा, महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली़ यात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ मांडल्याचे भयावह चित्र समोर झाले. विशेष म्हणजे चांगल्या व नामांकित शाळांचीही जीवघेणी अवस्था आहे. येथील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी (लारवा) व डेंग्यूचे डास आढळून आले़ अस्वच्छ टाकीतील शेवाळयुक्त पाणी नळाद्वारे विद्यार्थ्यांना प्यावे लागत असल्याची विदारक स्थितीही समोर आली़ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सोमवारी (दि़२२) शाळांत मुख्याध्यापकांची बैठक बोलवून शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पाळा, स्वच्छता राखा अन्यथा शाळांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली. दहा दिवसांत रुग्णालयात १८०० रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली़ यातील केवळ ३ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळले़ ५५० रुग्णांच्या प्लेटलेट तपासल्या़ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारीही १८५ रुग्णांची खास चाचणी करण्यात आली़ यात १४५ जणांची मलेरिया चाचणी घेतली; पण डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले नसल्याची माहिती आहे़ प्रौढांपेक्षा लहान मुले व नामांकित शाळांतील दहा वर्षे वयोगटाच्या आतील मुलेच अधिक आजारी पडत असल्याने तपासणीचा मोर्चा शाळांकडे वळविण्यात आला़ यात शैक्षणिक संस्थांची स्वच्छतेबद्दल उदासिनता उघड झाली़ आरोग्य विभाग, नगरपरिषद, लॉयन्स क्लब, समाजसेवी संस्था, नगरसेवक, विद्यार्थी शहरात स्वच्छता अभियान राबवित असून जनजागृती करीत आहेत़ शाळांमध्येच डेंग्यूचा अधिक धोका असल्याने पालक मात्र मुलांना शाळेत पाठवित नसल्याचेच दिसते़