शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:19 IST

चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देचार युवकांचा पुढाकार : पुणे ते आनंदवन सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.किसन ताकमोडे अहमदनगर, गणेश नरसाळे सोलापूर, राजेंद्र सोनवने नाशिक आणि सुरज कदम सातारा हे चार युवक यात सहभागी आहेत. यातील राजेंद्र सोनवने हे व्यवसायिक असून बाकी तिघेजण महाविद्यालयात शिकत आहे.सायकल चालवणे ही कला आनंदासोबत शरीराला व्यायाम देते. तसेच पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या समर्थ बनविते. हे खरे असले तरी भारता सारख्या देशात सायकल मात्र क्रांती घडवून आणू शकते हे आता सिध्द झालेले आहे. आनंदाला मुकणारे असंख्य आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि तो अवयव दानातून. पण आपल्याकडे मात्र अजूनही अवयवदानाची कल्पना फारशी रूजली नाही. मेल्यावरही आपण जीवंत राहू शकतो. त्यासाठी करावे लागणार अवयवदान. ही संकल्पना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि पुण्यातील शनिवार वाड्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ केल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.दिवसाला ७० ते ९० कि.मी.चा प्रवास चारही जण करतात. शाळा, महाविद्यालय, चौक, देऊळ, चहा टपरी, उपहारगृह आणि रात्रीच्या मुक्काम स्थळी आम्ही लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. सायकल चालविणे, अवयवदानाचे महत्त्व, पर्यावरण आदीचे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार अधिक रूजावा यासाठी आमची धडपड असल्याचे चौघांनी सांगितले.ही यात्रा राळेगणसिध्दी, स्नेहालय, देवगड, औरंगाबाद, जालना, लोणार, वाशिम, कारंजा, यवतमाळ आणि रविवारला सायंकाळी वर्धेवरून सेवाग्राम येथे पोहचली.महात्मा गांधीजींच्या आश्रमात दर्शन घेऊन प्रेरणा घेतली. नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून कार्यास प्रोत्साहित केले. सोमवारला सकाळी बापूकुटीचे दर्शन घेऊन चारही सायकलस्वार आनंदवन च्या दिशेने रवाना झाले. चला माणूस म्हणून जगू या आणि जगू द्या हा संदेश ते लोकांपर्यंत पोहचविणार आहे. आनंदवन येथे याचा समारोप १९ नोव्हेंबरला होणार आहे.२० ते २२ नोंव्हेबरपर्यंत हेमलकसा येथे मुक्काम करून २३ रोजी नागपूरला आल्यानंतर बसने पुण्याला परतणार आहे. सायकल यात्रेचे दुसरे वर्ष आहे.जेष्ठ समाज सेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्वातून सदर कार्य सुरू आहे. आश्रमात मार्गदर्शिका संगिता चव्हाण यांनी सायकल स्वाराशी संवाद साधून त्यांना आश्रमची माहिती दिली.