शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:19 IST

चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देचार युवकांचा पुढाकार : पुणे ते आनंदवन सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.किसन ताकमोडे अहमदनगर, गणेश नरसाळे सोलापूर, राजेंद्र सोनवने नाशिक आणि सुरज कदम सातारा हे चार युवक यात सहभागी आहेत. यातील राजेंद्र सोनवने हे व्यवसायिक असून बाकी तिघेजण महाविद्यालयात शिकत आहे.सायकल चालवणे ही कला आनंदासोबत शरीराला व्यायाम देते. तसेच पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या समर्थ बनविते. हे खरे असले तरी भारता सारख्या देशात सायकल मात्र क्रांती घडवून आणू शकते हे आता सिध्द झालेले आहे. आनंदाला मुकणारे असंख्य आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि तो अवयव दानातून. पण आपल्याकडे मात्र अजूनही अवयवदानाची कल्पना फारशी रूजली नाही. मेल्यावरही आपण जीवंत राहू शकतो. त्यासाठी करावे लागणार अवयवदान. ही संकल्पना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि पुण्यातील शनिवार वाड्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ केल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.दिवसाला ७० ते ९० कि.मी.चा प्रवास चारही जण करतात. शाळा, महाविद्यालय, चौक, देऊळ, चहा टपरी, उपहारगृह आणि रात्रीच्या मुक्काम स्थळी आम्ही लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. सायकल चालविणे, अवयवदानाचे महत्त्व, पर्यावरण आदीचे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार अधिक रूजावा यासाठी आमची धडपड असल्याचे चौघांनी सांगितले.ही यात्रा राळेगणसिध्दी, स्नेहालय, देवगड, औरंगाबाद, जालना, लोणार, वाशिम, कारंजा, यवतमाळ आणि रविवारला सायंकाळी वर्धेवरून सेवाग्राम येथे पोहचली.महात्मा गांधीजींच्या आश्रमात दर्शन घेऊन प्रेरणा घेतली. नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून कार्यास प्रोत्साहित केले. सोमवारला सकाळी बापूकुटीचे दर्शन घेऊन चारही सायकलस्वार आनंदवन च्या दिशेने रवाना झाले. चला माणूस म्हणून जगू या आणि जगू द्या हा संदेश ते लोकांपर्यंत पोहचविणार आहे. आनंदवन येथे याचा समारोप १९ नोव्हेंबरला होणार आहे.२० ते २२ नोंव्हेबरपर्यंत हेमलकसा येथे मुक्काम करून २३ रोजी नागपूरला आल्यानंतर बसने पुण्याला परतणार आहे. सायकल यात्रेचे दुसरे वर्ष आहे.जेष्ठ समाज सेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्वातून सदर कार्य सुरू आहे. आश्रमात मार्गदर्शिका संगिता चव्हाण यांनी सायकल स्वाराशी संवाद साधून त्यांना आश्रमची माहिती दिली.