शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला.

ठळक मुद्देमागोवा विधानसभेचा : काँग्रेसचाच राहिला वरचष्मा, यंदाही अपक्ष बाशिंग बांधूनच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला; पण जसजशी प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर सध्या वर्धा जिल्ह्यात पार पडणाऱ्या वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चार विधानसभेच्या जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी कामालाही लागले आहे. अनेक अपक्ष उमेदवार आमदारपदासाठी सध्या बाशिंग बांधून असून वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी दोनदा तर आर्वी मतदार संघातील मतदारांनी तीनवेळा अपक्ष उमेदवारांना बहुमताचा कौल दिल्याचे गत ५२ वर्षांचा इतिहास सांगतो.वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. मागील ५२ वर्षांत वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठ वेळा, तर आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार सात वेळा विजयी झाले. सध्या आर्वी काँग्रेसच्या तर वर्धा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असले तरी या निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला. त्यावेळी वर्ध्याचे आमदार म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राकाँत प्रवेश केलेल्या याच उमेदवाराने घड्याळ या चिन्हावर पुन्हा एकदा आपले राजकीय भविष्य अजमावले. परंतु, मतदारांनी मोदी लाटेवर स्वार होत भाजपच्या उमेदवाराला पसंती दिली. तर आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेसला सातवेळा, आयसीएस व भाजपला एक वेळा आणि अपक्ष उमेदवारांना तीनवेळा मतदारांनी बहुमताचा कौल दिला आहे. सध्या येथे काँगे्रसचा आमदार असून २००९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवाराने धोबीपछाड दिली होती. त्यानंतर आता २०१९ ची ही सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्याला दिला अपक्षाने धोबीपछाडवर्धा विधानसभा क्षेत्रात १९७८, १९८० व १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग विजय मिळविणाऱ्यां काँग्रेसच्या उमेदवाराला १९९० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने धोबीपछाडच दिली. परंतु, त्यानंतर याच काँग्रेसच्या उमेदवाराने पुन्हा १९९५, १९९९ व २००४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली.आमदारांना मिळतो प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधीराज्य सरकारकडून प्रत्येक आमदाराला प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटार, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी विकास आदी विकासकामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019