शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:18 IST

पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देजलसंकट गडद : साडेतीन महिने पाणी वापरावे लागेल काटकसरीनेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस लोटत गेले तसतसी जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने सध्या सहा दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. सध्यास्थितीत वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या धाम प्रकल्पात केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असल्याने नागरिकांनाही पुढील साडेतीन महिने पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून जीवन प्राधिकरण वर्धा शहराच्या शेजारील ग्रामीण भागात तर नगर पालिका प्रशासन शहरी भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करते. त्यामुळे धाम प्रकल्प हा वर्धा शहरासह शहराशेजारी असलेल्या सुमारे १५ गावांसाठी आधार देणाराच आहे. परंतु, मागील दोन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने हा प्रकल्प पूर्णत: भरला नाही. त्यामुळे यंदा कमालीच्या जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून पाटबंधारे विभागाकडून महिन्यातून केवळ एक वेळाच सदर जलाशयातील पाणी सोडले जात आहे. शिवाय पाण्याची उचल करणाऱ्या संस्थांना सदर विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना व गृहिणींना सहन करावा लागत आहे.मागील वर्षी होते २४.६५ दलघमी पाणीदिवसेंदिवस वाढत असलेली वर्धा शहर व शहराशेजारील लोकसंख्या तसेच त्यांची वाढणारी पाण्याची मागणी यामुळे भविष्यात उद्भवणारी जल समस्या लक्षात घेऊन धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचे वर्धा पाठबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने कागदोपत्री प्रक्रियाही सध्या केली जात आहे. परंतु, बड्या लोकप्रतिनिधींची उदासिनता व त्रुट्या शोधण्यात धन्यता मानत असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच धाम प्रकल्पाची उंची मागील काही वर्षांपासून केवळ कागदावरच वाढत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात धाम प्रकल्पात २४.६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. परंतु, यंदा तो केवळ ८.३८ दलघमी असल्याने पाण्याचा काटकसरीनेच वापर गरजेचा आहे.रामनगरात होतोयपाण्याचा अपव्ययरामनगर परिसरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महावीर बगीचात जलकुंभ आहे. परंतु, त्यापैकी एक जलकुंभातून सतत पाण्याची गळती होत आहे. सदर जलकुंभाची वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याने दररोज येथे शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.न.प.कडून टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरूसदर जलसंकटावर मात करण्यासाठी वर्धा न.प.ने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता यावा या अनुषंगाने काही खासगी टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवाय सदर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व्हावी यासाठीही अधिकाºयांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी