शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्दे१,८७६ हेक्टवर झाली कपाशी अन् तुरीची लागवड : उर्वरित खत वेळीच मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी तूर व कपाशी पिकाची लागवड केली आहे. इतकेच नव्हे, तर १ लाख २३ हजार ३१० मेट्रीक टन खतापैकी आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. उर्वरित खत येत्या काही दिवसांत मिळेल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे.यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. खरीप हंगामासाठी वर्धा जिल्ह्याला एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची गरज असून त्यापैकी ५२ हजार मेट्रिक टन खत शुक्रवारपर्यंत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर शनिवारी हिंगणघाट येथे आणि रविवारी वर्धा रेल्वे स्थानकाच्या मालधक्यावर खताची रॅक लागली असून दोन्ही रॅकच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याला ३ हजार मेट्रीक टन खत मिळणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.येत्या दहा दिवसांत पाच रॅक लागण्याचा अंदाजआतापर्यंत एकूण ५२ हजार मेट्रिक टन खत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर येत्या दहा ते पंधरा दिवसांत खताच्या पाच रॅक वर्धा जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या मालधक्क्यावर लागेल, असे कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले.खत कोंडी होईल काय?खरीप हंगामासाठी एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा वर्धा जिल्ह्याला झाला आहे. येत्या काही दिवसांत रॅक लागून खतसाठा मिळेल असे बोलले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा झालेला खतसाठा कमी असल्याने जिल्ह्यात खत कोंडी होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती