शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटी पोर्टलवर केवळ 4 हजार 290 शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते.

ठळक मुद्देप्रभावी जनजागृतीचा अभाव : जिल्ह्यात एकूण २.४८ लाख शेतकरी

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच क्लिकवर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी तसेच विविध योजनेचा लाभ घेता यावा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. पण या पोर्टलबाबत प्रभावी जनजागृती करण्याकडे कृषी विभाग दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याने आतापर्यंत केवळ ४ हजार २९० शेतकऱ्यांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते. नोंदणी करताना शेतकऱ्याला केवळ आधार कार्ड आणि सातबारा तसेच आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

निवडीनंतर कागदपत्र गुरूवार ३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत असून त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयं घोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत हे विषेश.  

इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करावीजिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २०९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करावी.- अनिल इंगळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

या योजनांच्या लाभासाठी करता येताे ऑनलाईन अर्जएकाच क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरास मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदीची माहिती मिळत असून त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही सादर करता येतो. 

नोंदणी करणे सोपेचशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. नोंदणी करताना केवळ आधारकार्ड, सातबारा आणि आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी