शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महाडीबीटी पोर्टलवर केवळ 4 हजार 290 शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते.

ठळक मुद्देप्रभावी जनजागृतीचा अभाव : जिल्ह्यात एकूण २.४८ लाख शेतकरी

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच क्लिकवर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी तसेच विविध योजनेचा लाभ घेता यावा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. पण या पोर्टलबाबत प्रभावी जनजागृती करण्याकडे कृषी विभाग दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याने आतापर्यंत केवळ ४ हजार २९० शेतकऱ्यांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते. नोंदणी करताना शेतकऱ्याला केवळ आधार कार्ड आणि सातबारा तसेच आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

निवडीनंतर कागदपत्र गुरूवार ३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत असून त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयं घोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत हे विषेश.  

इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करावीजिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २०९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करावी.- अनिल इंगळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

या योजनांच्या लाभासाठी करता येताे ऑनलाईन अर्जएकाच क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरास मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदीची माहिती मिळत असून त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही सादर करता येतो. 

नोंदणी करणे सोपेचशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. नोंदणी करताना केवळ आधारकार्ड, सातबारा आणि आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी