शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:54 IST

Wardha news agriculture अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  

ठळक मुद्दे हातातला घास मातीमोल होण्याचं संकटकांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : -अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  परीसरातील कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या   नागपुरसह   जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनामुळे बंद आहेत. विजांच्या कडकडाटासह   पावसाने रविवारी रात्री व दुपारपर्यंत कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरीने  हजेरी लावल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

शेतकऱ्यांची धावपळ

गेले तीन- चार दिवस ढगाळ वातावरण होते हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण, शनिवारला दुपारपासुनच  वातावरणात अचानक बदल झाला.  रविवारचे रात्री व दुपारपर्यंत व सोमवारला तळेगांवसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने  हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.

कांद्याची काढणी, पावसाची हजेरी संकट वाढवणारी

शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत भिजल्यानं  मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे.

कांद्याची मागणी घटली

कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्‍याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी  केली आहे .

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा