शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यावर एक, गेल्यावर दुसरी भूमिका; ही जनतेची दिशाभूल, समीर कुणावार यांचा घाणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:06 IST

हिंघणघाटमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेवर निशाणा

हिंगणघाट (वर्धा) : महाविकास आघाडीच्या काळात कृषिपंपांच्या देयकाची पठाणी वसुली केली जायची. देयक भरल्याशिवाय विद्युत पुरवठा केला जात नव्हता. एखाद्या रोहित्रावरील अर्ध्या शेतकऱ्यांनी देयक भरल्यानंतरही विद्युत सुरू केली जात नव्हती. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन मानसिकरित्या खचला होता. तेव्हा यात्रा काढणारे नेते कुठे गेले होते? यांची सरकार आल्यावर एक आणि गेल्यावर दुसरी भूमिका ही सर्वसामान्यांची दिशाभूल करणारी आहे, असा निशाणा आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेवर साधला.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थकीत बिल असेल तरी विनाविलंब एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता विद्युत पुरवठा मिळत आहे. दीड वर्षांच्या काळात एकही कृषी विद्युत पुरवठा खंडित गेला केला नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे ठरविले असून, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा कृषी विद्युत पुरवठा सुरू होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

२०२१ मध्ये जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णत: नष्ट झाले होते. त्या सोयाबीन पिकांचा मोबदला आणि खंडित केलेला कृषीचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून वर्ध्यात सात दिवस उपोषण करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सोयाबीनची नुकसानभरपाई देण्याची आणि थकीत देयक असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हा हे यात्रेकरू कुठे गेले होते? आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा खटाटोप चालविला आहे, असेही आ. कुणावार म्हणाले.

माजी आमदारांनी आजनसरा बॅरेज प्रकल्पाचे काम दोन महिन्यात सुरू करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. वास्तविकत: हे काम आता सुरूच होणार असल्याने केवळ श्रेय लाटण्यासाठी विरोधकांचा डाव असल्याने मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सन २००१ मध्ये आजनसरा बॅरेल प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही काम पुढे गेले नाही. २०१९ ते २०२२ महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. राज्यात परिवर्तन होताच उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आजनसरा बॅरेजकरिता निधीची तरतूद केली. आजनसरा येथील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅरेज प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. तीच बाब हेरून विरोधकांनी आता राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न चालविला असल्याचेही आमदार समीर कुणावार म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याऐवजी रात्रीला १२ तास वीज देत असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात टाकत आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा असून, सरकार शेतकरी हिताचे की विरोधी? हा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकरिता ही परिवर्तन जनसंवाद यात्रा काढली आहे. निवडणुकींना अद्याप दीड ते दोन वर्ष वेळ आहे. त्याही लावणार की नाही, याची शाश्वती नाही.

- अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :PoliticsराजकारणSameer Kunwarसमीर कुणावारwardha-acवर्धा