शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

एकाच दिवशी ४२ शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:09 IST

शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली.

ठळक मुद्देवनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी राबविला ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. याला नियमाप्रमाणे निकाली काढायला ४ महिन्याचा अवधी लागणार होता. मात्र त्यांनी प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबवित थेट गावातच दरबार भरविला.मोई येथे वन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. गावातील एकापाठोपाठ ४२ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी दिल्या. वनविभागात तक्रारी येताच वनाधिकारी अमोल चौधरी यांनी वनरक्षक, वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक या सर्वांना सोबत घेवून मोई ग्रामपंचायतच्या आवारात दरबार भरविला. थेट सर्व शेतकºयांना बोलावून शेतातील नुकसानिची पाहणी करून पंचनाम तयार केले त्यावर सर्वांच्या सह्या झाल्या. आर्थिक नुकसान जागेवरच मंजुर केले. या आदर्श कार्यतत्पर कामामुळे मोईच्या सरपंच पद्मा कुसराम, उपसरपंच किसन चव्हान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वनाधिकारी चौधरी यांचे आभार मानले. एकूण ४२ प्रकरण मंजुरी करेपर्यंत किमान चार महिने कालावधी गेला असता. मात्र प्रशासन कार्यशील असले पाहिजे याची जाणीव चौधरी यांनी ठेवल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम तात्काळ मिळण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील मोई गाव जंगलाशेजारी आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.शेतीपिकांचे झालेले नुकसान दावे तात्काळ निघाली पाहिजे एवढाच उद्देश ठेवत प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबविला.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग