शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

एसटीच्या वर्धा विभागाला दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : सात दिवसांपासून फिरलीच नाहीत चाके

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला तब्बल दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. संपूर्ण विभागात एकूण २६७ बसगाड्या आहेत. लग्नसराईचा काळ महामंडळाकरिता सुगीचा असतो. मात्र, यावेळी कोरोनाने सर्वत्र कहर केल्याने लग्नसोहळे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांनाही जबर फटका बसला आहे.शासनाच्या आदेशावरून गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केली आहे. जिल्ह्याच्या सीमाही सिल करण्यात आल्या असून खासगी आणि सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वर्धा विभागांतर्गत पाचही आगारातून औरंगाबाद, नाशिक, पुणे, शिर्डी, नांदेड आदी लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात दररोज शेकडोवर बसफेºया सोडल्या जातात. वर्धा विभागाचे दररोजचे सरासरी उत्पन्न २० लाख रुपये इतके आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत बसफेºया मागील सात दिवसांपासून १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.या सात दिवसांच्या काळात महामंडळाच्या केवळ वर्धा विभागाला वाहतूक उत्पन्नापोटी दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती तशीही फारशी चांगली नसून पूर्वीच तोट्यात आहे. कोरोना संकटाने महामंडळाच्या तोट्यात मात्र, आणखी भर घातली आहे.वर्धा विभागात २६७ बसगाड्यावर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. चारही आगार मिळून एकूण २६७ बसगाड्या आहेत. यात लांब पल्ल्यावर धावणाºया चार अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे या सर्व बसगाड्या सद्यस्थितीत त्या त्या-त्या आगारात उभ्या आहेत.कोरोनाचा विषाणूला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मागील सात दिवसांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिलपर्यंत महामंडळही लॉकडाऊन असणार आहे. हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता असून विभागांतर्गतच्या आगारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.चेतन हसबनीसविभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा

टॅग्स :state transportएसटी