शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

रुग्णवाहिका तीन, चालक एक, वाद होतात अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 16:43 IST

प्रशासनाने तीन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला दिल्या आहेत. मात्र, चालक एकच असल्याने दोन रुग्णवाहिका केंद्रातच उभ्या राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही.

ठळक मुद्देचालक नसल्याने घडतोय प्रकार : रुग्णांमध्ये होतोय गैरसमज

वर्धा : रुग्णालय म्हटलं की रुग्णवाहिका आलीच. त्यामुळे रुग्णांची प्रकृती आरोग्य केंद्रात सावरण्यासारखी नसली तर रुग्णवाहिकांची मागणी केल्या जाते. प्रशासनाने तीन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला दिल्या आहेत. मात्र, चालक एकच असल्याने दोन रुग्णवाहिका केंद्रातच उभ्या राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. परिणामी रुग्णांचा गैरसमज होऊन वादाचे प्रकार घडत आहे. त्यामुळे चालकांची भरती करण्याची मागणी केली जात आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक वर्षांपासून जननी सुरक्षा योजनेची एक रुग्णवाहिका उपलब्ध असून त्यानंतर कोरोनात नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आमदार दादाराव केचे यांनी जुलै महिन्यात अद्ययावत सोयी सुविधा युक्त रुग्णवाहिका प्रदान केली. त्यानंतर लसीकरण वाहन म्हणून नामदार नितीन राऊत यांच्यामार्फत सीएसआर अंतर्गत एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सध्या ३ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे अकस्मात स्थितीत रुग्णांना येथून मोठ्या रुग्णालयात अत्यावश्यक उपचाराच्या दृष्टीने रेफर केले असता रुग्णवाहिकांची मागणी होणे साहजिकच आहे.

अशा स्थितीत चालक जर दुसऱ्या वाहनावर बाहेर गेला असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णवाहिका असूनदेखील रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वादाचे प्रसंग घडतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच कोंडी होत असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णवाहिकेवर किंवा आरोग्य विभागाच्या वाहनावर स्वतंत्र चालकाची नियुक्ती करणे गरजेचे आहेत.

लाखो रुपयाची वाहने उपलब्ध असताना नागरिकांना त्याचा फायदा होऊ नये, ही शोकांतिका आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देत चालकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या अनेक गावांचा परिसर मोठा असून आरोग्य केंद्रात किमान २४ गावं येत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा रुग्णांना उपलब्ध वाहनांची सोयी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

वाहने आहेत तर त्याचा उपयोग नागरिकांना झालाच पाहिजे. अनेक ठिकाणी आमची इच्छा असूनही नागरिकांना वाहन उपलब्ध करून देता येत नाही. वाहन जरी उपलब्ध असले तरी अनेकदा अतिरिक्त चालक उपलब्ध राहत नाही. अनेक अडचणी आहेत. रुग्णांना योग्य सुविधा प्राप्त झाल्यास आम्हालाही आनंद होतो. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून उपाययोजना होणे गरजेचे आहे.

डॉ. अंजली केचे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्य