शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एका ठाण्यातून १५८५ प्रकरणे न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:42 IST

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्येक ‘ब्रॅन्ड’च्या दारूची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे वास्तव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत असले तरी दारूबंदी जिल्ह्यात नावालाच असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देदारूबंदी : ३० महिन्यांत १९२६ विक्रेते जेरबंद

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्येक ‘ब्रॅन्ड’च्या दारूची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे वास्तव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत असले तरी दारूबंदी जिल्ह्यात नावालाच असल्याचे दिसून येते. दारूबंदीच्या कायद्यान्वये कारवाई करून अवघ्या ३० महिन्यांत एकाच पोलीस ठाण्यातून तब्बल १५८५ प्रकरणे न्यायप्रविष्ठ करण्यात आलीत.जिल्ह्यात एकूण १९ पोलीस ठाणे असून प्रत्येक वर्षाला मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांविरूद्ध प्रकरणे न्यायप्रविष्ठ केली जात आहेत; पण शिक्षा होण्याचे प्रमाण दाखल प्रकरणाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचेच प्राप्त माहितीवरून दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्यात १९ पोलीस ठाणे असून पूर्वी यांची संख्या १७ होती. रामनगर आणि सावंगी मेघे हे पोलीस ठाणे नव्याने तयार करण्यात आल्याने वर्धा शहर आणि सेवाग्राम पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण पूर्वीच्या तुलनेत कमी झाला. असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागात अल्प मनुष्यबळ असल्याने दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीची मोठी जबाबदारीच पोलिसांच्या खांद्यावर आलेली आहे. खून, मारहाण, दरोडे, चोऱ्या आदी गुन्ह्यांचा तपास करतानाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना अर्धिधिक शक्ती दारू पकडण्यावरच खर्च करावी लागत आहे.१९ डिसेंबर २०१५ रोजी नव्याने तयार करण्यात आलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात यंदाच्या मे अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये एकूण १९०७ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी १९२६ दारूविक्रेत्यांना जेरबंद करून १ कोटी ८ लाख ८ हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उल्लेखनिय म्हणजे, याच ३० महिन्यांच्या कालावधीत रामनगर पोलीस ठाण्याच्यावतीने दारूबंदी कायद्यान्वये तपास पूर्ण करून १५८५ प्रकरणे न्यायप्रविष्ठ करण्यात आली आहेत तर ३४१ प्रकरणे येत्या काही दिवसांत न्यायप्रविष्ठ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयही प्रती दिवशी केवळ पाच प्रकरणे स्वीकारत असल्याचे सांगण्यात आले.दारूबंदी अंमलबजावणीत राज्य उत्पादन शुल्क विभाग मागेचराज्य उत्पादन शुल्क विभागावर दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आहे; पण तेथील अधिकारी व कर्मचारी आमच्याकडे अल्प मनुष्यबळ असल्याची ओरड करीत जबाबदारीकडे पाठ दाखवित असल्याचे दिसते. न्यायालयात केवळ दारूबंदी कायद्याचेच नव्हे तर इतरही गुन्ह्यांची अशी केवळ पाच प्रकरणे स्वीकारली जातात. यामुळे या प्रकरणात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.एकाला शिक्षादारूविक्री प्रकरणी संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायप्रविष्ठ केलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने आरोपी फिरोज खाँ पठाण रा. जुनापाणी चौरस्ता याला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरणही रामनगर पोलीस ठाण्यात दाखल होते, हे विशेष!

टॅग्स :liquor banदारूबंदी