शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

दीड कोटीचा रस्ता वर्षभरात खड्ड्यांत

By admin | Updated: September 18, 2015 01:53 IST

रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय.

वर्धा : रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय. गतवर्षीच या रस्त्याच्या दुरूस्तीवर तब्बल १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले; पण अल्पावधीतच रस्ता जैसे थे झाला. सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दुरूस्तीचा खर्च व्यर्थच ठरल्याचे दिसते.रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो; पण रस्त्यांची अवस्था सुधारताना दिसत नाही. वर्धा ते वायगाव (नि.) या मार्गाचीही अशीच अवस्था आहे. या मार्गावरील बोरगाव (मेघे) ते नवोदय विद्यालय या ४ किमी रस्त्याचे काम २०१४ मध्ये करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहन धारकांना दिलासा मिळाला होता. या चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या मार्गाचे तीन भाग पाडण्यात आले होते. यात महावितरण कार्यालय ते बोरगाव (मेघे) साखळी क्र. ५७.५०० व ५८.६०० या १.१ किमी लांब व ७ मिटर रूंदीच्या रस्त्याचे काम फेबु्रवारी २०१४ सुरू झाले. या कामाचे ३० लाख रुपयांचे कंत्राट चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनी पुलगाव यांना देण्यात आले होते. भाग क्र. दोन बोरगाव (मेघे) ते फार्मसी कॉलेजपर्यंत साखळी क्र. ५८.६०० व ६०.५०० या १.९ किमी लांब रस्त्याचे काम मार्च २०१४ मध्ये सुरू झाले. हे काम आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ३६ लाख रुपयांत देण्यात आले. भाग क्र. तीन साखळी क्र. ६०.५०० व ६२.००० अंतर १.५ किमी हे काम एप्रिल २०१४ मध्ये सुरू झाले. या कामाचे ८० लाख रुपयांचे कंत्राट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन कंत्राटदार कंपन्यांमार्फत १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून करण्यात आले; पण हा संपूर्ण निधी व्यर्थ गेल्याचेच दिसते. वर्षभरातच या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यांत पाणी साचते व यामुळे अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दीड कोटी खर्च करूनही डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे दुरूस्ती काम अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना संबंधित विभाग त्या कामांकडे लक्ष देत नसल्याचेच दिसते. वर्धा ते वायगाव व पुढे हिंगणघा, राळेगावपर्यंत या मार्गावर सतत रहदारी सुरू असते. शिवाय दोन कंपन्या व अन्य उद्योग असल्याने अवजड वाहनेही धावत असतात. यामुळे या रस्त्याचा दर्जा राखणे गरजेचे होते; पण त्याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. कंत्राटदार व बांधकाम विभाग यांच्यातील कमीशनबाजीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा शासनाच्या निधीचा दुरूपयोग नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बोरगाव ते वायगाव हे १० किमी अंतर आहे. यातील ४ किमीच्या कामावर १ कोटी ४६ लाख रुपये खर्च झाले. यानंतरही रस्ता खड्ड्यांतच आहे. उर्वरित रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर आहे. दिवाळीनंतर सदर काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. या कामात तरी दर्जा राखावा, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)