शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीचा रस्ता वर्षभरात खड्ड्यांत

By admin | Updated: September 18, 2015 01:53 IST

रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय.

वर्धा : रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय. गतवर्षीच या रस्त्याच्या दुरूस्तीवर तब्बल १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले; पण अल्पावधीतच रस्ता जैसे थे झाला. सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दुरूस्तीचा खर्च व्यर्थच ठरल्याचे दिसते.रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो; पण रस्त्यांची अवस्था सुधारताना दिसत नाही. वर्धा ते वायगाव (नि.) या मार्गाचीही अशीच अवस्था आहे. या मार्गावरील बोरगाव (मेघे) ते नवोदय विद्यालय या ४ किमी रस्त्याचे काम २०१४ मध्ये करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहन धारकांना दिलासा मिळाला होता. या चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या मार्गाचे तीन भाग पाडण्यात आले होते. यात महावितरण कार्यालय ते बोरगाव (मेघे) साखळी क्र. ५७.५०० व ५८.६०० या १.१ किमी लांब व ७ मिटर रूंदीच्या रस्त्याचे काम फेबु्रवारी २०१४ सुरू झाले. या कामाचे ३० लाख रुपयांचे कंत्राट चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनी पुलगाव यांना देण्यात आले होते. भाग क्र. दोन बोरगाव (मेघे) ते फार्मसी कॉलेजपर्यंत साखळी क्र. ५८.६०० व ६०.५०० या १.९ किमी लांब रस्त्याचे काम मार्च २०१४ मध्ये सुरू झाले. हे काम आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ३६ लाख रुपयांत देण्यात आले. भाग क्र. तीन साखळी क्र. ६०.५०० व ६२.००० अंतर १.५ किमी हे काम एप्रिल २०१४ मध्ये सुरू झाले. या कामाचे ८० लाख रुपयांचे कंत्राट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन कंत्राटदार कंपन्यांमार्फत १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून करण्यात आले; पण हा संपूर्ण निधी व्यर्थ गेल्याचेच दिसते. वर्षभरातच या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यांत पाणी साचते व यामुळे अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दीड कोटी खर्च करूनही डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे दुरूस्ती काम अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना संबंधित विभाग त्या कामांकडे लक्ष देत नसल्याचेच दिसते. वर्धा ते वायगाव व पुढे हिंगणघा, राळेगावपर्यंत या मार्गावर सतत रहदारी सुरू असते. शिवाय दोन कंपन्या व अन्य उद्योग असल्याने अवजड वाहनेही धावत असतात. यामुळे या रस्त्याचा दर्जा राखणे गरजेचे होते; पण त्याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. कंत्राटदार व बांधकाम विभाग यांच्यातील कमीशनबाजीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा शासनाच्या निधीचा दुरूपयोग नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बोरगाव ते वायगाव हे १० किमी अंतर आहे. यातील ४ किमीच्या कामावर १ कोटी ४६ लाख रुपये खर्च झाले. यानंतरही रस्ता खड्ड्यांतच आहे. उर्वरित रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर आहे. दिवाळीनंतर सदर काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. या कामात तरी दर्जा राखावा, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)