शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

शेतमालाला दीडपट भाव, नुसताच ठरतोय जुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:14 IST

कापूसविक्रीतून हाती घाटाच : एकरी ५ हजारांचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : दिवाळीच्या तोंडावर बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात खासगी व्यापारी कापसाला सात ते साडेसात हजार भाव देत आहे. एक एकरातील कापूस लागवडीसाठी येणारा खर्च व त्यातून सरासरी येणारे उत्पादन व बाजारभाव याची जुळवणी केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपयांचा थेट फटका बसतो आहे. शासनाच्या वतीने शेतमालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन नुसतेच जुमला ठरते आहे. तर शेतकऱ्याने केलेली मेहनतही हाती पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यासाठी सरासरी शेतकऱ्यांना सरासरी ३३ हजार ७०० रुपये खर्च आला. यात उन्हाळा वाही मशागत २००० रु., सारे अथवा बेड फाडणे १००० रु., बियाणे दोन बॅग १ हजार ६०० रुपये, लावण खर्च ५०० रु., डवरनी ४ फेर २००० रू., खताची मात्र दोन वेळा दोन हजार रू., खत टाकने मजुरी ६०० रू., दोनवेळ नींदन खर्च १० हजार रू, फवारणी औषधी खर्च पाच हजार, फवारणी मजुरी दोन हजार, वण्य प्राण्यापासून संरक्षणासाठी कंपाउंड करणे एक हजार, वेचणी खर्च पाच हजार, कापूस विक्रीसाठी बाजारात शेतमाल वाहून नेण्यासाठी भाडे एक हजार असा खर्च आला आहे. यात मजूर उपलब्ध असण्यावर मजुरी अधिक तर डवरण, फवारणीसाठी वेळेवर मजूर बैलजोडी न मिळाल्यास अधिकचे भाडे द्यावे लागले. तो खर्चही यातून वगळण्यात आला आहे. 

कापूस पिकाचा सरासरी विचार केल्यास एकरी चार क्विंटलपेक्षा अधिक होण्याची शक्यता नाही. अशात दिवाळी सण गोड व्हावा म्हणून शेतकऱ्यांकडून शीतादही केलेल्या कापसाची वेचणी करीत शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेला जातो आहे. मात्र भाव दबावात असल्याने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना सात साडेसात हजारांना कापूस व्यापाऱ्यांच्या घशात टाकावा लागतो आहे. कापूसविक्रीतून शेतकऱ्याला २८ ते ३० हजार रुपये हाती पडणार आहे. शेतीवर होणारा खर्च, बघता उत्पादनातून हाती पडणारी रोख यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच गत सोयाबीन पिकाची आहे. तर तूर पीक यंदाच्या अतिवृष्टीत सखल भागातील पीक मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाले. 

कपाशीवर आला लाल्या किमान कपाशीच्या दोन वेच्यानंतर कपाशीवर लाल्या रोग आढळून येत होता. यंदा मात्र पहिली वेचणीच्या वेळीच लाल्या रोगाचे आक्रमण दिसून आले आहे. पाने लाल पडली असून बोंडे धरायच्या आधीच झाडे वाळतील की काय अशी स्थिती दिसून येत आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा