शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

तिसऱ्या दिवशीही काँग्रेसची जनसंवाद यात्रा, आमदार कांबळे यांची उपस्थिती

By चैतन्य जोशी | Updated: September 5, 2023 16:05 IST

देवळी विधानसभा क्षेत्रात आगमन

वर्धा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आष्टी शहीद येथून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली होती. ५ रोजी जनसंवाद पदयात्रा देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात दाखल झाली. आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांनी मार्गस्थ होत जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुलगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने पदयात्रा नाचणगाव होत देवळीकडे मार्गस्थ झाली.

सायंकाळी देवळी येथे जाहीर सभेने तिसऱ्या दिवसाच्या पदयात्रेचा समारोप होणार आहे. उद्या ६ रोजी पुन्हा देवळी येथून ही पदयात्रा वर्धेकडे रवाना होणार आहे. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण मार्गात आमदार रणजित कांबळे हे नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेताना दिसले.३ रोजीपासून आष्टी शहीद येथून ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुरु झाली. पदयात्रा नऊ दिवस जिल्ह्याच्या चारही विधानसभा मतदार संघात जाणार आहे. नऊ दिवसात एकूण सात तालुक्यात ही पदयात्रा जातं नागरिकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारने जनतेची केलेली पोलखोल समोर आणणार आहे.

१२ रोजी पदयात्रेचा समारोप सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात होणार आहे. जनसंवाद पदयात्रेत कमिटीच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष छोटू चांदुरकर, माजी नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर, बाजार समितीचे सभापती मनोज वसू, नाचणगाव ग्रा.पं.च्या सरपंच निलीमा राऊत, संजय देवगडे, कुशल चेंबुलवार, विकास ढोक, प्रमोद ठाकरे आदींसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसwardha-acवर्धा