शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही काँग्रेसची जनसंवाद यात्रा, आमदार कांबळे यांची उपस्थिती

By चैतन्य जोशी | Updated: September 5, 2023 16:05 IST

देवळी विधानसभा क्षेत्रात आगमन

वर्धा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आष्टी शहीद येथून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली होती. ५ रोजी जनसंवाद पदयात्रा देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात दाखल झाली. आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांनी मार्गस्थ होत जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुलगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने पदयात्रा नाचणगाव होत देवळीकडे मार्गस्थ झाली.

सायंकाळी देवळी येथे जाहीर सभेने तिसऱ्या दिवसाच्या पदयात्रेचा समारोप होणार आहे. उद्या ६ रोजी पुन्हा देवळी येथून ही पदयात्रा वर्धेकडे रवाना होणार आहे. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण मार्गात आमदार रणजित कांबळे हे नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेताना दिसले.३ रोजीपासून आष्टी शहीद येथून ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुरु झाली. पदयात्रा नऊ दिवस जिल्ह्याच्या चारही विधानसभा मतदार संघात जाणार आहे. नऊ दिवसात एकूण सात तालुक्यात ही पदयात्रा जातं नागरिकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारने जनतेची केलेली पोलखोल समोर आणणार आहे.

१२ रोजी पदयात्रेचा समारोप सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात होणार आहे. जनसंवाद पदयात्रेत कमिटीच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष छोटू चांदुरकर, माजी नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर, बाजार समितीचे सभापती मनोज वसू, नाचणगाव ग्रा.पं.च्या सरपंच निलीमा राऊत, संजय देवगडे, कुशल चेंबुलवार, विकास ढोक, प्रमोद ठाकरे आदींसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसwardha-acवर्धा