शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

जुने रस्ते उखडले; नव्या रस्त्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: November 14, 2015 02:21 IST

गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कोलमडली : निधी देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळआष्टी (शहीद) : गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली. त्यांच्या योजनेने गावे शहराशी जोडली गेली. प्रत्येक गावात पक्का रस्ता गेला. दळणवळण सोयीचे झाले. नागरिकांकरिता महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत कालांतराने निधी कमी होवू लागल्याने नियोजन कोलमडले आहे. सध्यस्थितीत केंद्राकडून झालेल्या कामांचे पैसे सुद्धा मिळत नसल्याने योजनेच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत वर्षभरापासून एकही नवीन काम मंजूर झाले नाही. राज्यातून ठराव गेले; मात्र केंद्राने निधी देण्यास हात वर केले. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते निर्माणाच्या प्रतीक्षेत आहेत. गावकऱ्यांना खडतर मार्गातून वाट काढावी लागत आहे. आष्टी तालुक्यात मोई-माणिकवाडा, गोदावरी, टेकोडा, आष्टी, किन्हाळा, लहानआर्वी, लिंगापूर, वाडेगाव, कोल्हाकाळी, मोई, मुबारकपूर, थार, बोरखेडी या रस्त्यांची लांबी व कामाचा दर्जा पाहता मोठी तरतूद आवश्यक आहे. मात्र अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्याचे नियोजन करून केंद्राकडे पाठविले आहे. सन २०१४-१५ मध्ये एकही काम मंजूर झाले नसल्याची माहिती आहे. निधीच नाही तर नवीन कामे येणार तरी कसे हा मोठा प्रश्न आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात भरमसाठ निधीमुळे चांगल्या प्रोव्हीजन घेता येतात. त्यामुळे सदर रस्ते चिरकाल टिकून राहते नागरिकांनाही ही योजना पसंत आली होती. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून योजना ही पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. या योजनेमधून सुजातपूर, भारसवाडा, भिष्णूर रस्त्याचे काम १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले. यातील ५ कोटी ४० लक्ष रुपये अद्याप आले नाही. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले आहेत. यासाठी दिल्ली येथे झालेल्या मोर्चा, निदर्शनामध्ये राज्यातील सर्व कंत्राटदार हजर होते. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. एकूणच शासन चांगली योजना गुंडाळून ठेवण्याच्या मार्गावर दिसते. या धर्तीवर मुख्यमंत्री रस्ते योजना कार्यान्वित होणार असल्याचे या विभागाच्या कार्यालयात बोलले जात आहे. या संदर्भात मात्र कुठलीही ठोस माहिती नाही.(प्रतिनिधी)