शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जुने रस्ते उखडले; नव्या रस्त्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: November 14, 2015 02:21 IST

गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कोलमडली : निधी देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळआष्टी (शहीद) : गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली. त्यांच्या योजनेने गावे शहराशी जोडली गेली. प्रत्येक गावात पक्का रस्ता गेला. दळणवळण सोयीचे झाले. नागरिकांकरिता महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत कालांतराने निधी कमी होवू लागल्याने नियोजन कोलमडले आहे. सध्यस्थितीत केंद्राकडून झालेल्या कामांचे पैसे सुद्धा मिळत नसल्याने योजनेच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत वर्षभरापासून एकही नवीन काम मंजूर झाले नाही. राज्यातून ठराव गेले; मात्र केंद्राने निधी देण्यास हात वर केले. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते निर्माणाच्या प्रतीक्षेत आहेत. गावकऱ्यांना खडतर मार्गातून वाट काढावी लागत आहे. आष्टी तालुक्यात मोई-माणिकवाडा, गोदावरी, टेकोडा, आष्टी, किन्हाळा, लहानआर्वी, लिंगापूर, वाडेगाव, कोल्हाकाळी, मोई, मुबारकपूर, थार, बोरखेडी या रस्त्यांची लांबी व कामाचा दर्जा पाहता मोठी तरतूद आवश्यक आहे. मात्र अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्याचे नियोजन करून केंद्राकडे पाठविले आहे. सन २०१४-१५ मध्ये एकही काम मंजूर झाले नसल्याची माहिती आहे. निधीच नाही तर नवीन कामे येणार तरी कसे हा मोठा प्रश्न आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात भरमसाठ निधीमुळे चांगल्या प्रोव्हीजन घेता येतात. त्यामुळे सदर रस्ते चिरकाल टिकून राहते नागरिकांनाही ही योजना पसंत आली होती. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून योजना ही पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. या योजनेमधून सुजातपूर, भारसवाडा, भिष्णूर रस्त्याचे काम १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले. यातील ५ कोटी ४० लक्ष रुपये अद्याप आले नाही. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले आहेत. यासाठी दिल्ली येथे झालेल्या मोर्चा, निदर्शनामध्ये राज्यातील सर्व कंत्राटदार हजर होते. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. एकूणच शासन चांगली योजना गुंडाळून ठेवण्याच्या मार्गावर दिसते. या धर्तीवर मुख्यमंत्री रस्ते योजना कार्यान्वित होणार असल्याचे या विभागाच्या कार्यालयात बोलले जात आहे. या संदर्भात मात्र कुठलीही ठोस माहिती नाही.(प्रतिनिधी)