शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सूर नदीवर पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:12 IST

सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता.

ठळक मुद्देरेतीचोरीला आले होते उधाण : तक्रारी, निवेदनानंतर घेतलीय दखल

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता. अखेर तक्रारी व निवेदनाचा ओघ वाढतच गेला. त्याला लोमकतने वाचा फोडल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेत पंचनामा केला.मागील वर्षभरापासून सूर नदीला रेती चोरट्यांनी लक्ष केले होते. दिवसरात्र या नदीवरुन चोरटी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत लोकमतने सलग वृत्ताच्या माध्यमातून वाचा फोडली. त्यामुळे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी रेती जप्त करून ती तहसील कार्यालयात जमा केली होती; पण कुणावरही कारवाई केली नसल्याने कारवाईचा वचक राहिला नाही. त्या कारवार्ईत रेती, चाळण्या, घमेले, फावडे जप्त करण्यातच महसूल विभागाने धन्यता मानली. महसूल विभागातील अधिकाºयांचे रेती चोरट्यांसोबत मिलीभगत असल्याने ते कारवाईचा केवळ दिखावा करुन दंड ठोठावून सोडून देतात. त्यामुळे रेती माफीयाही निर्ढावले आहे. अधिकाºयांचा धाक राहिला नसल्याने या नदीपात्राला पोखरण्याचे काम सुरुच होते. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. तेव्हा महसूल यंत्रणेला जाग आली. अखेर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.नदीपात्रातील रेती केली जप्त; पण कारवाई कुणावर होणार?सूर नदीवर गुरुवारला सकाळी मंडळ अधिकारी उईके यांनी सहकाºयांसह धडक केली. तेव्हा नदीपात्रात रेतीचे ढिग आढळून आले. त्यांनी पंचनामा करीत हे रेतीचे ढिग जप्त केले. पण, आता यासंदर्भात कारवाई कोणावर होणार? याचे उत्तर देण्यासाठी अधिकारी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे ही कारवाई फक्त कागदोपत्रीच तर राहणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.मोझरी परिसरातून रेतीची अवैध वाहतूकमोझरी (शेकापूर) परिसरातील नाल्यांवरून पावसाळा संपला तोच नदीचे पाणी कमी झाल्याबरोबर वाळूमाफीयांचा नजरा रेतीवर पडल्या. गेल्या काही दिवसांपासून येथून ३ कि़मी. अंतरावर असलेल्या वर्धा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतुक सुरू आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासनाला लाखोंचा मिळणारा महसूल हे रेतीचोर लांबवत आहे. सध्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात रेतीघाट बंद असल्यामुळे तसेच नवीन रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने चढ्या भावाने रेती विकत असल्याचे दिसते. मोझरी परिसरातील झगळी शिवारातून पांदन रस्त्याने तसेच काही शेतकºयांच्या शेतातून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक सुरू आहे. या चोरट्या वाहतूकीला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :riverनदीsandवाळू