शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि सरपंच गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु, एकाही अधिकाऱ्याने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी अधिकाऱ्यांचे पाय उपोषण मंडपाकडे वळले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, याकरिता आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर व दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. खुद्द आमदार उपोषणाला बसल्यावरही अधिकारी खुर्च्या राखत असल्याने रोष व्यक्त होत होता. शुक्रवारी ‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधीक्षक लोखंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सावंत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी उपोषण मंडपात जाऊन मागण्या जाणून घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उलट हे उपोषण आणखी व्यापक होणार,  असा इशारा आ.कुणावार यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा गटनेता नितीन मडावी, सभापती माधव चंदनखेडे, कामगार नेता मिलिंद देशपांडे यांच्यासह उपोषणकर्ते उपस्थित होते.

तुम्ही अधिकारी, राजकारण करु नका! -  अखेर ‘लोकमत’च्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आ. कुणावार यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु, गेल्या तीन दिवसापासून एकाही अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे आमदारांनी या अधिकाऱ्यांना ‘साहेब... तुम्ही अधिकारी आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी येथे उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन समस्या सोडविणे अपेक्षित आहे. कोण्या नेत्याच्या दबावात येऊन राजकारण करु नका!’, असा सज्जड इशारा दिला.

 सर्व आमदार मिळून आवाज उठवणार : चंद्रशेखर बावनकुळे-    माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपोषणस्थळी उपस्थित राहून आमदार कुणावार यांच्याशी चर्चा केली. तसेच मागील सरकारच्या काळात तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमुळे कंपन्या तोट्यात येत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी कापणे बंद करा, पथदिवे सुुरू करा,  सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोगलशाही करु नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्व आमदार मिळून ३ तारखेला पायऱ्यावर बसून आंदोलन करु. गरज पडल्यास आझाद मैदानावर मोर्चा काढू असा इशारा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना दिला.

 

टॅग्स :agitationआंदोलनMLAआमदार