शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि सरपंच गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु, एकाही अधिकाऱ्याने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी अधिकाऱ्यांचे पाय उपोषण मंडपाकडे वळले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, याकरिता आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर व दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. खुद्द आमदार उपोषणाला बसल्यावरही अधिकारी खुर्च्या राखत असल्याने रोष व्यक्त होत होता. शुक्रवारी ‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधीक्षक लोखंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सावंत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी उपोषण मंडपात जाऊन मागण्या जाणून घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उलट हे उपोषण आणखी व्यापक होणार,  असा इशारा आ.कुणावार यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा गटनेता नितीन मडावी, सभापती माधव चंदनखेडे, कामगार नेता मिलिंद देशपांडे यांच्यासह उपोषणकर्ते उपस्थित होते.

तुम्ही अधिकारी, राजकारण करु नका! -  अखेर ‘लोकमत’च्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आ. कुणावार यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु, गेल्या तीन दिवसापासून एकाही अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे आमदारांनी या अधिकाऱ्यांना ‘साहेब... तुम्ही अधिकारी आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी येथे उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन समस्या सोडविणे अपेक्षित आहे. कोण्या नेत्याच्या दबावात येऊन राजकारण करु नका!’, असा सज्जड इशारा दिला.

 सर्व आमदार मिळून आवाज उठवणार : चंद्रशेखर बावनकुळे-    माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपोषणस्थळी उपस्थित राहून आमदार कुणावार यांच्याशी चर्चा केली. तसेच मागील सरकारच्या काळात तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमुळे कंपन्या तोट्यात येत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी कापणे बंद करा, पथदिवे सुुरू करा,  सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोगलशाही करु नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्व आमदार मिळून ३ तारखेला पायऱ्यावर बसून आंदोलन करु. गरज पडल्यास आझाद मैदानावर मोर्चा काढू असा इशारा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना दिला.

 

टॅग्स :agitationआंदोलनMLAआमदार