शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अतवृष्टी; शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 24, 2014 23:52 IST

संपूर्ण विदर्भात झालेल्या अतवृष्टीमध्ये येथील भोलेश्‍वरी नदीला आलेल्या पुराने काठावरील दीडशे शेतकर्‍यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शासनाने अशा शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत

रोहणा : संपूर्ण विदर्भात झालेल्या अतवृष्टीमध्ये येथील भोलेश्‍वरी नदीला आलेल्या पुराने काठावरील दीडशे शेतकर्‍यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शासनाने अशा शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती; पण सर्व्हे झाल्यापासून आजपर्यंत हे अनुदान शेतकर्‍यांना मिळाले नाही. यामुळे सदर अनुदानाची आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न पिडीत शेतकरी उपस्थित करीत आहेत.

१२ जुलै २0१३ रोजी संपूर्ण विदर्भात अतवृष्टी झाली. यात भोलेश्‍वरी नदीला पूर आला. यामुळे रोहण्यातील अनेक घरांत पाणी शिरले. यात मोठय़ा प्रमाणात वित्त हानी झाली. नदी काठावरील हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात रेती व गोटे येऊन पडलेत. शेतातील पिके, कुंपण, ठिबक सिंचन साहित्य, स्प्रिंकलर संच वाहून गेलेत. शासनाने या नुकसानीचा सर्व्हे केला. त्यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजारापर्यंत मदत देण्याचे जाहीर केले. आता १0 महिन्यांचा काळ लोटला. अतवृष्टीबाबतच्या इतर नुकसानीचे अनुदान अनेकांना मिळाले; पण अद्याप परिसरातील ज्या १00 ते १५0 शेतकर्‍यांची जमीन खरडून गेली, त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे शासन आपला शब्द पाळणार की, आता पिडीतांना वार्‍यावर सोडून देणार, याबाबत शंका कुशंका निर्माण होत आहे. शासनाने सदर अनुदान त्वरित शेतकर्‍यांना वितरित करून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)