शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:53 IST

जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत.

ठळक मुद्देजीवनदायी झाली घाण : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाऱ्या जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत. देशात नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात असताना वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी वर्धा नदी पावसाळ्यात ठणठणीत कोरडी आहे. पात्रातील खड्ड्यांत जे काही थोडं पाणी आहे तेही घाण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाने देशातील पवित्र नद्यांची स्वच्छता मोहीम राबवून नद्यांचे जलशुद्धीकरण केले. परंतु चार जिल्ह्यातून वाहात जावून गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या धार्मिक स्थळी वैनंगगेत विलीन होणारी वर्धा नदी मात्र केंद्र व राज्य शासनाकडून उपेक्षितच राहिली आहे.नदी पात्रात जलपर्णी लव्हाळ व घाण पाण्याची डबकी साचल्याने धार्मिक पर्वात मूर्ती विसर्जन करताना भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नदीतील घाण पाण्याची व नैसर्गिक क्रियेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे विविध प्रकारच्या रोगांचाही प्रादुर्भाव होत आहे.नगर प्रशासनाने शहरातील सामाजिक संघटनांचा सहकार्य घेवून या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी शहरात आलेले पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळ यांनी आपल्या पोलीस मित्रांच्या व शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्धा नदीच्या पात्रात स्वच्छता मोहिम राबवून सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच भगीरथ पुन्हा समोर येण्याची प्रतिक्षा शहरवासी करीत आहे.मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्याच्या मुलताई येथून उगम पाऊन दक्षिण वाहिनी ठरलेली वर्धा नदी काठच्या परिसर म्हणजे एकेकाळी नैसर्गिक सौदर्य ठरायचा. परंतु नदीकाठी असणारे घाट, माती, झाडे, झुडपांनी व्यापलेली आहे. पूर्वी पालकवाडी म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्ह्याला वर्धा हे नाव मिळाले ते या नदीमुळेच. इंग्रजांनी बांधलेल्या रेल्वे पुलामुळेच पुलगाव म्हणजे ब्रीज टाईन पुलाचे गाव असा उल्लेख आढळतो. या नदीने जिल्ह्याला नाव दिले. तिला उपेक्षित ठेवण्यात येत आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी