शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:53 IST

जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत.

ठळक मुद्देजीवनदायी झाली घाण : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाऱ्या जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत. देशात नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात असताना वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी वर्धा नदी पावसाळ्यात ठणठणीत कोरडी आहे. पात्रातील खड्ड्यांत जे काही थोडं पाणी आहे तेही घाण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाने देशातील पवित्र नद्यांची स्वच्छता मोहीम राबवून नद्यांचे जलशुद्धीकरण केले. परंतु चार जिल्ह्यातून वाहात जावून गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या धार्मिक स्थळी वैनंगगेत विलीन होणारी वर्धा नदी मात्र केंद्र व राज्य शासनाकडून उपेक्षितच राहिली आहे.नदी पात्रात जलपर्णी लव्हाळ व घाण पाण्याची डबकी साचल्याने धार्मिक पर्वात मूर्ती विसर्जन करताना भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नदीतील घाण पाण्याची व नैसर्गिक क्रियेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे विविध प्रकारच्या रोगांचाही प्रादुर्भाव होत आहे.नगर प्रशासनाने शहरातील सामाजिक संघटनांचा सहकार्य घेवून या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी शहरात आलेले पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळ यांनी आपल्या पोलीस मित्रांच्या व शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्धा नदीच्या पात्रात स्वच्छता मोहिम राबवून सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच भगीरथ पुन्हा समोर येण्याची प्रतिक्षा शहरवासी करीत आहे.मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्याच्या मुलताई येथून उगम पाऊन दक्षिण वाहिनी ठरलेली वर्धा नदी काठच्या परिसर म्हणजे एकेकाळी नैसर्गिक सौदर्य ठरायचा. परंतु नदीकाठी असणारे घाट, माती, झाडे, झुडपांनी व्यापलेली आहे. पूर्वी पालकवाडी म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्ह्याला वर्धा हे नाव मिळाले ते या नदीमुळेच. इंग्रजांनी बांधलेल्या रेल्वे पुलामुळेच पुलगाव म्हणजे ब्रीज टाईन पुलाचे गाव असा उल्लेख आढळतो. या नदीने जिल्ह्याला नाव दिले. तिला उपेक्षित ठेवण्यात येत आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी