शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीतच

By admin | Updated: November 29, 2014 02:03 IST

राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा फेरआढावा घेण्याच्या नावाखाली बांठिया समितीने दिलेल्या अहवालानुसार धोरण राबवित आहे.

वर्धा : राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा फेरआढावा घेण्याच्या नावाखाली बांठिया समितीने दिलेल्या अहवालानुसार धोरण राबवित आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद होण्याचा धोका असून मागील शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. शासनाकडून निधी नसल्याची ओरड होत आहे. याबाबत शासनाने त्वरीत तोडगा न काढल्यास समता परिषद आंदोलक पवित्रा घेण्याचा इशारा समता परिषदेने दिला. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, वित्त मंत्री यांच्याकडे देण्यात आले आहे. या निवेदनानुसार, वित्त मंत्रालयाने खर्च कपातीची सबब पुढे करीत शिष्यवृत्ती बंद करण्याचा प्रस्तावच सादर केला जात आहे. मागील वर्षीची ११०० कोटी रूपयाची शिष्यवृत्ती थकित आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती निळालेली नाही. यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न सतावत आहे. महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्यावतीने विदर्भातील शाळा महाविद्यालये बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद आहे.शासनाने घोषणा केल्यानुसार ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पुर्तता तर केलेली नाहीच शिवाय शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेताला जात आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल. सरकारजवळ पैसेच नाही असे रडगाणे गावुन, राज्य शासनाची ३८० कोटीची ओबीसी शिष्यवृत्ती बंद करण्यासाठी वित्त खात्याचा प्रस्ताव सादर करीत आहे. हे ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च, व्यावसायिक आणि इंजिनिअरींग, मेडीकल शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रकार आहे. या अन्यायाच्या विरोधात व ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन केले जाईल.यात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा व विद्यार्थी संघटनांचाही सहभाग असेल असे दिवाकर गमे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना सांगितले. ओबीसी संघटनांच्या गोलमेज परीषदेमधील ओबीसी जणगणना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अन्यायकारक घोषणा, ओबीसींना सरकारी नोकरीत बंदी करणारे गडचिरोली व इतर जिल्ह्यातील पेसा कायदा रद्द करणे याबाबी अन्यायकारक आहे. सरकारने काळात ओबीसीचे ६ टक्के पर्यंत कमी केलेले आरक्षण पुर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना संपुर्ण १०० टक्के शिष्यवृत्ती व शुल्क परतावा देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन सादर करताना समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, किशोर तितरे, सुधीर पांगुळ, संजय मस्के, जयंत मानकर, अनिरुध्द गवई, सुरेश सातोकर, प्रदीप डगवार, संजय भगत, दिपक वांदिले, स्वप्नील पट्टेवार, गजानन देशमुख, धनराज वाडे, अभय पुसदकर, गोविंदा मानकर, प्रदिप देशकर, अविनाश बानाईत यासह परीषदेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)