शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देअब्दुल रेहमान : वर्ध्यातील आंदोलनातून केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा ही महात्मा गांधीजींची भूमी आहे. गांधीजींनी सत्य आणि अहिसेंची लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज देशात खोटे आणि हिंसा वाढत आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए आणि एनपीआर कायद्यामुळे केवळ देशातील मुस्लिमच नव्हे तर इतर समाजातही भीती निर्माण झाली आहे. हा कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली.केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर वर्धा सेक्युलर फोरमच्यावतीने सोमवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्रि-दिवसीय धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली. यावेळी ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील बेरोजगारी, आरोग्य, महिलांवरील अत्याचार याबाबत चिंतन करून यावर काय उपाययोजना करावी, याकडे लक्ष न देता केंद्र सरकार एनपीआर आणि सीएएकडे नागरिकांचे लक्ष वेधत आहे. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आदी विविध समाज बांधव भाईचाऱ्याने राहतात. पण, या कायद्यामुळे या समाजात तेढ निर्माण होणार आहे.सीएए, एनआरसी कायदा देशातील ८० टक्के नागरिकांच्या विरोधात असल्याचे यावेळी रेहमान यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात चंद्रपूर येथील रमजान अली, सेक्यूर फोरमचे रिजवान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, आशिष सोनटक्के आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक