शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

आता वर्ध्यातील विद्युत वाहिनीही होणार भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:50 IST

वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१८५ कोटींचा प्रस्ताव। अपघात टळतील आणि महावितरणचे नुकसानही

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.वादळवारा, पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीला सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचे वास्तव आहे. याशिवाय विद्युत चोरीचे प्रकारदेखील सुरूच असतात. विविध प्रकारच्या अपघातांमध्ये वीज वितरणचेच नुकसान होते. याशिवाय कधी-कधी निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहर काळोखात बुडते. या घटनांची मागील काही वर्षांत प्रमाण वाढल्याने महावितरण कंपनीने तब्बल १८५ कोटींचा प्रस्ताव ११ फेब्रुवारीला मुख्य अभियंता, महावितरण यांच्याकडे पाठविला आहे. तेथून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.महावितरणच्या मुंबईतील मुख्यालयाने प्रस्तावातील त्रुटी दूर करीत मंजुरी दिल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाकडे तो निधी उपलब्धतेसाठी पाठविला जाणार आहे. शहर ओव्हरहेड वीजवाहिनीमुक्त करण्याकरिता तब्बल १६२ किलोमीटर दुहेरी उच्चदाब तर ५७६ किलोमीटर लघुदाब विद्युत वाहिनीचे जाळे अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने टाकले जाणार आहे. याशिवाय सर्कल पद्धतीचे रिंग मेन युनिट कार्यान्वित करण्यात येणार असून एका ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास या सर्कलमधील पर्यायी व्यवस्थेतून तो पूर्ववत सुरू करता येणार असल्याने ग्राहकांना २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. या प्रस्तावावर ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यास शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल, असे बोलले जात आहे.सिव्हिल लाईनपासून काम प्रगतिपथावरशहरातील सिव्हिल लाईनपासून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम मंजूर करून घेतले. राष्टÑपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर उच्चदाब विद्युत वाहिनी भूमिगत टाकली जात आहे.

टॅग्स :electricityवीज