शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

आता वर्ध्यातील विद्युत वाहिनीही होणार भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:50 IST

वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१८५ कोटींचा प्रस्ताव। अपघात टळतील आणि महावितरणचे नुकसानही

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.वादळवारा, पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीला सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचे वास्तव आहे. याशिवाय विद्युत चोरीचे प्रकारदेखील सुरूच असतात. विविध प्रकारच्या अपघातांमध्ये वीज वितरणचेच नुकसान होते. याशिवाय कधी-कधी निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहर काळोखात बुडते. या घटनांची मागील काही वर्षांत प्रमाण वाढल्याने महावितरण कंपनीने तब्बल १८५ कोटींचा प्रस्ताव ११ फेब्रुवारीला मुख्य अभियंता, महावितरण यांच्याकडे पाठविला आहे. तेथून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.महावितरणच्या मुंबईतील मुख्यालयाने प्रस्तावातील त्रुटी दूर करीत मंजुरी दिल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाकडे तो निधी उपलब्धतेसाठी पाठविला जाणार आहे. शहर ओव्हरहेड वीजवाहिनीमुक्त करण्याकरिता तब्बल १६२ किलोमीटर दुहेरी उच्चदाब तर ५७६ किलोमीटर लघुदाब विद्युत वाहिनीचे जाळे अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने टाकले जाणार आहे. याशिवाय सर्कल पद्धतीचे रिंग मेन युनिट कार्यान्वित करण्यात येणार असून एका ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास या सर्कलमधील पर्यायी व्यवस्थेतून तो पूर्ववत सुरू करता येणार असल्याने ग्राहकांना २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. या प्रस्तावावर ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यास शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल, असे बोलले जात आहे.सिव्हिल लाईनपासून काम प्रगतिपथावरशहरातील सिव्हिल लाईनपासून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम मंजूर करून घेतले. राष्टÑपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर उच्चदाब विद्युत वाहिनी भूमिगत टाकली जात आहे.

टॅग्स :electricityवीज