शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

आता फळ पिकांनाही विमा संरक्षण

By admin | Updated: January 31, 2015 01:55 IST

जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान ..

वर्धा : जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान आधारीत फळ पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत विमा काढता येणार आहे़वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि केळी फळ पिकांना १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१५ पर्यंत गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा प्रस्तावानुसार देय होणारी नुकसान भरपाई पूर्णपणे संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांना परस्पर अदा करणार आहे. फळ पिकाचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपीट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित बँकेला, विमा कंपनीला आणि कृषी विभागाला त्वरित कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाचा विमा उतरविल्यानंतर विम्याची रक्कम विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे़ वेळेवर विमा प्रस्ताव बँकेकडून सादर न झाल्यास नुकसान भरपाई संबंधित संस्था अदा करील. हवामान आधारीत फळ पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे़संत्रा फळपिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा आणि वाठोडा, कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी आणि कन्नमवारग्राम तर आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव येथील बागायतदार शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ शिवाय मोसंबी फळपिकांसाठी कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी व कन्नमवारग्राम, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव आणि केळी पिकांसाठी सेलू तालुक्यातील झडशी या महसूल मंडळामधील शेतकरी हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविलेली ही पीक विमा योजना आता फळ पिकांनाही लाभदायक ठरणार, असे चित्र आहे़(कार्यालय प्रतिनिधी)