शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आता फळ पिकांनाही विमा संरक्षण

By admin | Updated: January 31, 2015 01:55 IST

जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान ..

वर्धा : जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान आधारीत फळ पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत विमा काढता येणार आहे़वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि केळी फळ पिकांना १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१५ पर्यंत गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा प्रस्तावानुसार देय होणारी नुकसान भरपाई पूर्णपणे संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांना परस्पर अदा करणार आहे. फळ पिकाचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपीट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित बँकेला, विमा कंपनीला आणि कृषी विभागाला त्वरित कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाचा विमा उतरविल्यानंतर विम्याची रक्कम विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे़ वेळेवर विमा प्रस्ताव बँकेकडून सादर न झाल्यास नुकसान भरपाई संबंधित संस्था अदा करील. हवामान आधारीत फळ पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे़संत्रा फळपिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा आणि वाठोडा, कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी आणि कन्नमवारग्राम तर आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव येथील बागायतदार शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ शिवाय मोसंबी फळपिकांसाठी कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी व कन्नमवारग्राम, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव आणि केळी पिकांसाठी सेलू तालुक्यातील झडशी या महसूल मंडळामधील शेतकरी हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविलेली ही पीक विमा योजना आता फळ पिकांनाही लाभदायक ठरणार, असे चित्र आहे़(कार्यालय प्रतिनिधी)