शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पर्यावरण संवर्धनासाठी समग्र शिक्षण अंतर्गत शाळांमध्ये आता 'इको क्लब' ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:36 IST

Vardha : अक्षरे गिरवण्याबरोबर विद्यार्थी लावणार निसर्गालाही जीव संगोपनाची जबाबदारी खांद्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, म्हणून सर्व शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी अक्षरे गिरवण्याबरोबर निसर्गालाही जीव लावणार आहेत. पर्यावरणाच्या धड्याबरोबर शाळेत रोपटी लावून त्यांचे संगोपनही करणार आहेत. वृक्षारोपण केलेल्या झाडांना विद्यार्थ्यांची व वर्गाची नावे दिली जाणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोपक्रमशील नागरिक तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. या धोरणानुसार समग्र शिक्षण अंतर्गत शाळेतील इको क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरणाच्या समस्या जाणून घेणे, पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रमांचा समावेश करणे, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक असावे यासाठी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन होणार आहे. फक्त क्लब स्थापन करून थांबायचे नाही. तर पर्यावरण विषयक जागृती, ई वेस्ट, प्लास्टिक यांचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहे. इको क्लब अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे. त्यासाठी एका आठवड्याचे शिबिरही आयोजित करणार आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे, ई- कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती दिली जाणार आहे.

मुख्याध्यापक राहणार इको क्लबचे प्रमुख शाळेत स्थापन केलेल्या इको क्लबचे प्रमुख मुख्याध्यापक राहणार असून प्रत्येक शाळेत दोन शिक्षक व एक वर्ग प्रभारी उपक्रम राबविण्यास मदत करणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि समन्वयक प्रत्येक वर्गातील मुलांचे पालक इको क्लबचे सदस्य राहणार आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहित करतील. इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

"नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरण मित्रत्व आणि पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे."- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :wardha-acवर्धा