शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:53 IST

येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो.

ठळक मुद्देनगरसेवकांची बहुमताने हिरवी झेंडी : पूर्वी होते ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो. पूर्वी वर्धेकरांसाठी ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीब ठेवल्या जायचे; पण तेही पाणी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अपूरे पडत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या न.प.च्या सर्वसाधारण सभेत ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.वर्धा शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जातो. नागरिकांना पुरवठा करण्यात येणारे पाणी वर्धा न. प. प्रशासन पाटबंधारे विभागाकडून खरेदी करते. पवनार व येळाकेळे येथील धाम नदी पात्रातून या पाण्याची उचल केल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत तो जलसाठा ठिकठिकाणी असलेल्या जलकुंभात साठवून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. न. प. प्रशासनाने सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. त्यांच्याकडून न. प. प्रशासन पाणी पट्टी कर वसूल करते. पूर्वी पाटबंधारे विभागाकडून ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवून न.प. प्रशासनाकडून त्यापेक्षा जादा पाण्याची उचल करण्यात आल्याने न. प. ला पेनॉल्टी लागत होती; पण आता वाढती लोकसंख्या व वाढलेली पाण्याची मागणी लक्षात घेता ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी बहूमताने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता न.प.ला पेनॉल्टी सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागणार नसून नागरिकांनाही मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.१४ हजार कुटुंबीयांना नळ जोडणीअमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ आदी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा न. प. प्रशासनाने आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. दिवसेंदिवस नळ जोडणी बाबातचे नागरिकांचे आवेदन न. प. कडे प्राप्त होत असून मागेल त्याला नळ जोडणी देण्यात येत आहे.प्रती हजार लिटरप्रमाणे मोजावे लागते पैसेधाम नदीच्या येळाकेळी व पवनार येथील पात्रातून उचल करण्यात येणाºया पाण्याचे प्रती हजार लिटर प्रमाणे पैसे न.प. प्रशासनाला मोजावे लागतात. न.प. प्रशासन प्रत्येक महिन्याला त्याचे देयक पाटबंधारे विभागाला अदाही करते. खरीपात २.९३ रुपये, रबी हंगामात ५.८५ रुपये तर उन्हाळी हंगामात ८.७८ रुपये प्रती हजार लिटर मागे न.प. प्रशासनाला मोजावे लागते. तर न.प. प्रशासन नळ जोडणी दिलेल्या नागरिकाकडून वर्षाला पाणी पट्टी कर म्हणून १ हजार ५०० रुपयांचे देयक देत त्याची वसूली करते. न.प. प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या एक करार करण्यात आला आहे. हा करार सहा वर्षांसाठी करण्यात आला असून प्रत्येक वर्षी एक वेगळा करारही करण्यात येतो.पाणी आरक्षणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाउन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आरक्षीत केलेल्या पाण्यापेक्षा जादाचीच उचल न.प. प्रशासनाकडून होत होती. परिणामी, न.प. प्रशासनाला पेनॉल्टीही लागत होती. परंतु, आता पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठल्या शहरासाठी किती पाणी आरक्षीत ठेवावे याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे न. प. अधिकाऱ्यांनी सांगितले.लिकेज दुरूस्तीमुळे पाण्याच्या अपव्ययाला ब्रेकशहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी येळाकेळी ते वर्धा व पवनार ते वर्धा या मुख्य जलवाहिनींसह शहरात जलवाहिनीचे मोठे जाळेच टाकण्यात आले आहे. परंतु, जलवाहिनी वेळोवेळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. सध्या स्थितीत पवनार ते वर्धा व येळाकेळी ते वर्धा या मुख्य जलवाहिनीसह ठिकठिकाणचे जलवाहिनीचे लिकेजस दुरूस्त करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाला ब्रेक लागल्याचे न. प. पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी