शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:53 IST

येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो.

ठळक मुद्देनगरसेवकांची बहुमताने हिरवी झेंडी : पूर्वी होते ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो. पूर्वी वर्धेकरांसाठी ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीब ठेवल्या जायचे; पण तेही पाणी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अपूरे पडत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या न.प.च्या सर्वसाधारण सभेत ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.वर्धा शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जातो. नागरिकांना पुरवठा करण्यात येणारे पाणी वर्धा न. प. प्रशासन पाटबंधारे विभागाकडून खरेदी करते. पवनार व येळाकेळे येथील धाम नदी पात्रातून या पाण्याची उचल केल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत तो जलसाठा ठिकठिकाणी असलेल्या जलकुंभात साठवून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. न. प. प्रशासनाने सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. त्यांच्याकडून न. प. प्रशासन पाणी पट्टी कर वसूल करते. पूर्वी पाटबंधारे विभागाकडून ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवून न.प. प्रशासनाकडून त्यापेक्षा जादा पाण्याची उचल करण्यात आल्याने न. प. ला पेनॉल्टी लागत होती; पण आता वाढती लोकसंख्या व वाढलेली पाण्याची मागणी लक्षात घेता ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी बहूमताने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता न.प.ला पेनॉल्टी सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागणार नसून नागरिकांनाही मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.१४ हजार कुटुंबीयांना नळ जोडणीअमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ आदी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा न. प. प्रशासनाने आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. दिवसेंदिवस नळ जोडणी बाबातचे नागरिकांचे आवेदन न. प. कडे प्राप्त होत असून मागेल त्याला नळ जोडणी देण्यात येत आहे.प्रती हजार लिटरप्रमाणे मोजावे लागते पैसेधाम नदीच्या येळाकेळी व पवनार येथील पात्रातून उचल करण्यात येणाºया पाण्याचे प्रती हजार लिटर प्रमाणे पैसे न.प. प्रशासनाला मोजावे लागतात. न.प. प्रशासन प्रत्येक महिन्याला त्याचे देयक पाटबंधारे विभागाला अदाही करते. खरीपात २.९३ रुपये, रबी हंगामात ५.८५ रुपये तर उन्हाळी हंगामात ८.७८ रुपये प्रती हजार लिटर मागे न.प. प्रशासनाला मोजावे लागते. तर न.प. प्रशासन नळ जोडणी दिलेल्या नागरिकाकडून वर्षाला पाणी पट्टी कर म्हणून १ हजार ५०० रुपयांचे देयक देत त्याची वसूली करते. न.प. प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या एक करार करण्यात आला आहे. हा करार सहा वर्षांसाठी करण्यात आला असून प्रत्येक वर्षी एक वेगळा करारही करण्यात येतो.पाणी आरक्षणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाउन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आरक्षीत केलेल्या पाण्यापेक्षा जादाचीच उचल न.प. प्रशासनाकडून होत होती. परिणामी, न.प. प्रशासनाला पेनॉल्टीही लागत होती. परंतु, आता पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठल्या शहरासाठी किती पाणी आरक्षीत ठेवावे याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे न. प. अधिकाऱ्यांनी सांगितले.लिकेज दुरूस्तीमुळे पाण्याच्या अपव्ययाला ब्रेकशहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी येळाकेळी ते वर्धा व पवनार ते वर्धा या मुख्य जलवाहिनींसह शहरात जलवाहिनीचे मोठे जाळेच टाकण्यात आले आहे. परंतु, जलवाहिनी वेळोवेळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. सध्या स्थितीत पवनार ते वर्धा व येळाकेळी ते वर्धा या मुख्य जलवाहिनीसह ठिकठिकाणचे जलवाहिनीचे लिकेजस दुरूस्त करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाला ब्रेक लागल्याचे न. प. पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी