शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

आता मुख्यमंत्र्यांच्या वर्धा जिल्ह्यात प्रवेशावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:07 IST

किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही.

ठळक मुद्देपत्रपरिषदेतील माहिती : किसान अधिकार अभियानचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही. यामुळे १९ डिसेंबर २०१७ रोजी गळाभेट आंदोलन केले; पण पोलिसांनी स्थानबद्ध करीत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घालून दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशिवाय प्रश्न सुटणार नसल्याने त्यांची वेळ घेतो, असे सांगितले; पण रात्री उशीरापर्यंत भेट झाली नाही. यामुळे आता मुख्यमंत्र्यांना वर्धा जिल्ह्यात प्रवेशबंदी आंदोलन करणार असल्याचे अविनाश काकडे यांनी सांगितले.गळाभेटीनंतरच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याकरिता किसान अधिकार अभियानच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी पाहुणचार आंदोलन केले होते. यातून विविध उपाययोजना सूचविल्या होत्या; पण कारवाई झाली नाही. आता गळाभेट आंदोलन केले; पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. ७५ ते ८० कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. यामुळे चर्चा होऊ शकली नाही. २०१३-१४ मध्ये बोरधरण प्रकल्पाची सिंचन क्षमता १७ हजार तर प्रत्यक्ष सिंचन ७ हजार हेक्टर होते. आताही तीच स्थिती असली तरी मुख्यमंत्री कागदावर आकडा फुगवून १२ हजार हेक्टर सिंचन होत असल्याचे सांगत आहेत. वास्तविक, सिंचन क्षेत्रात एक हेक्टरचीही वाढ झालेली नाही. वर्धा जिल्ह्यात केवळ ३० हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. ती दीड लाख हेक्टर होऊ शकते; पण उपाययोजना केल्या जात नाही. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी कागदावर आकडा फुगविला असून ६० हजार हेक्टर सिंचन होत असल्याचे दाखविले आहे. यावर विरोधकांनी आवाज उठविला तर त्यांच्यावर चौकशीचा दबाव आणला जातो.केवळ मुंबईवरून घोषणा करायच्या असतील तर वर्धा जिल्ह्यात यानंतर पायही ठेवायचा नाही, असा गर्भगळीत इशारा किसान अधिकार अभियानने दिला आहे. यासाठी शुक्रवारपासून गावोगावी मोहीम सुरू करण्यात येत आहे. शिवाय शेजारील यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रवेशबंदी आंदोलन करणार आहे. यासाठी सहयोगी शेतकरी संघटना, सामाजिक तथा राजकीय संघटनांना एकत्र आणून लढा उभारण्यसात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत अविनाश काकडे यांनी सांगितले. याप्रसंगी किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, प्रफुल्ल कुकडे, विठ्ठल झाडे, भाऊराव काकडे, अनंत ठाकरे आदी उपस्थित होते.सभागृहातील माहितीत फुगविले जातात आकडेसभागृहात योजनांची माहिती देताना मोठे आकडे सांगितले जातात; पण प्रत्यक्ष गावांतील शेतकऱ्यांना फायदे मिळाले काय, हे तपासले जात नाही. तीन वर्षांपूर्वी सिंचन विभागातील ३५ टक्के पदे रिक्त होती. आता केवळ ३५ टक्के अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. वर्धा जिल्ह्यात सिंचन विभागाची ३३५ पदे मंजूर असून केवळ १०१ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून २३४ पदे रिक्त आहेत. कालवे, उपकालवे, पाटचऱ्या, सायपण यांच्या दुरूस्तीसाठी सिंचन विभागाने ४ हजार ५०० कोटींची मागणी केली आहे; पण शासनाने प्रत्यक्षात केवळ १ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर केला. तो निधीही अद्याप देण्यात आला नाही. मग, सिंचन क्षेत्रात वाढ कशी होणार, हा प्रश्नच आहे. सेलू तालुक्यातील ४५० शेतकऱ्यांच्या २० हजार क्विंटल कापसाचे ८.५० कोटी रुपये अद्याप मिळाले नाहीत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे ऐकून घेण्यास तयार नसून केवळ कागदावरील आकडे सांगण्यात व्यस्त आहे.