शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आता मुख्यमंत्र्यांच्या वर्धा जिल्ह्यात प्रवेशावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:07 IST

किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही.

ठळक मुद्देपत्रपरिषदेतील माहिती : किसान अधिकार अभियानचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही. यामुळे १९ डिसेंबर २०१७ रोजी गळाभेट आंदोलन केले; पण पोलिसांनी स्थानबद्ध करीत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घालून दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशिवाय प्रश्न सुटणार नसल्याने त्यांची वेळ घेतो, असे सांगितले; पण रात्री उशीरापर्यंत भेट झाली नाही. यामुळे आता मुख्यमंत्र्यांना वर्धा जिल्ह्यात प्रवेशबंदी आंदोलन करणार असल्याचे अविनाश काकडे यांनी सांगितले.गळाभेटीनंतरच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्याकरिता किसान अधिकार अभियानच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी पाहुणचार आंदोलन केले होते. यातून विविध उपाययोजना सूचविल्या होत्या; पण कारवाई झाली नाही. आता गळाभेट आंदोलन केले; पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. ७५ ते ८० कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. यामुळे चर्चा होऊ शकली नाही. २०१३-१४ मध्ये बोरधरण प्रकल्पाची सिंचन क्षमता १७ हजार तर प्रत्यक्ष सिंचन ७ हजार हेक्टर होते. आताही तीच स्थिती असली तरी मुख्यमंत्री कागदावर आकडा फुगवून १२ हजार हेक्टर सिंचन होत असल्याचे सांगत आहेत. वास्तविक, सिंचन क्षेत्रात एक हेक्टरचीही वाढ झालेली नाही. वर्धा जिल्ह्यात केवळ ३० हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. ती दीड लाख हेक्टर होऊ शकते; पण उपाययोजना केल्या जात नाही. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी कागदावर आकडा फुगविला असून ६० हजार हेक्टर सिंचन होत असल्याचे दाखविले आहे. यावर विरोधकांनी आवाज उठविला तर त्यांच्यावर चौकशीचा दबाव आणला जातो.केवळ मुंबईवरून घोषणा करायच्या असतील तर वर्धा जिल्ह्यात यानंतर पायही ठेवायचा नाही, असा गर्भगळीत इशारा किसान अधिकार अभियानने दिला आहे. यासाठी शुक्रवारपासून गावोगावी मोहीम सुरू करण्यात येत आहे. शिवाय शेजारील यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रवेशबंदी आंदोलन करणार आहे. यासाठी सहयोगी शेतकरी संघटना, सामाजिक तथा राजकीय संघटनांना एकत्र आणून लढा उभारण्यसात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत अविनाश काकडे यांनी सांगितले. याप्रसंगी किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, प्रफुल्ल कुकडे, विठ्ठल झाडे, भाऊराव काकडे, अनंत ठाकरे आदी उपस्थित होते.सभागृहातील माहितीत फुगविले जातात आकडेसभागृहात योजनांची माहिती देताना मोठे आकडे सांगितले जातात; पण प्रत्यक्ष गावांतील शेतकऱ्यांना फायदे मिळाले काय, हे तपासले जात नाही. तीन वर्षांपूर्वी सिंचन विभागातील ३५ टक्के पदे रिक्त होती. आता केवळ ३५ टक्के अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. वर्धा जिल्ह्यात सिंचन विभागाची ३३५ पदे मंजूर असून केवळ १०१ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून २३४ पदे रिक्त आहेत. कालवे, उपकालवे, पाटचऱ्या, सायपण यांच्या दुरूस्तीसाठी सिंचन विभागाने ४ हजार ५०० कोटींची मागणी केली आहे; पण शासनाने प्रत्यक्षात केवळ १ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर केला. तो निधीही अद्याप देण्यात आला नाही. मग, सिंचन क्षेत्रात वाढ कशी होणार, हा प्रश्नच आहे. सेलू तालुक्यातील ४५० शेतकऱ्यांच्या २० हजार क्विंटल कापसाचे ८.५० कोटी रुपये अद्याप मिळाले नाहीत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे ऐकून घेण्यास तयार नसून केवळ कागदावरील आकडे सांगण्यात व्यस्त आहे.