शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक नव्हे, तर वेठबिगारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:20 IST

राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देखदखद : मानधन रखडल्याने ६३ परिचालकांची उपजीविका ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही. त्यांना मानधन देण्याची जबाबदारी ना तर सरकार स्विकारत आहे, ना संबंधित कंपनी; परिणामी, या परिचालकांची सेवा ही सरकार व कंपनीसाठी केवळ वेठबिगार ठरत असल्याची खदखद संतप्त परिचालकानी लोकमतजवळ व्यक्त ेकेली आहे.राज्य सरकारने देवळी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन संगणक परिचालकांची नियुक्ती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे असभ्य वर्तन आणि अनियमीत मिळणारे मानधन, यामुळे काही संगणक परिचालकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. देवळी तालुक्यातील ६३ परिचालक कार्यरत असून, काहींवर दोन केंद्रांचा कार्यभार सोपविला आहे. वर्षभरापासून मानधनाचा एक पैसाही मिळाला नाही. त्यामुळे कुटूंबाची उपजीविका कशी करायची, असा प्रश्न अनेक संगणक परिचालकांना पडला आहे.राज्य शासनाने मनरेगातंर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा दर २०३ रुपये प्रती दिवस ठरविला. मात्र सुशिक्षित संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीही केले नाही. मानधन मिळत नसल्याने काहींनी कामे सोडली तर काहींनी गावतच मजुरीची कामे करायला सुरुवात केली. राज्य शासनाने ही केंद्र चालविण्याचा कंत्राट 'सीएसी' (कन्व्हरन्स सर्व्हिसेस इंडिया लिमेटेड ) नामक कंपनीला दिला आहे. पूर्वी हा कंत्राट दुसऱ्या कंपनीकडे होते. कंत्राटदार कंपनी बदलली तरी संगणक परिचालकांच्या समस्या सुटल्या नाही. काही परिचालकांना पदरमोड करुन इंटरनेटची बिले भरावी लागत आहे. काहींना ग्राम पंचायतीचे कामे'सायबर कॅफे' मधून करवून आणावी लागतात. त्यासाठीचा खर्च स्वत: करावा लागतो. हा प्रकार अधिकारी, पदधिकारी व लोकप्रतिनींधीना माहिती असूनही ते केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे.शासकीय निधीवर डल्लाप्रत्येक ग्रामपंचायतला लोकसंख्येच्या आधारावर सरकारकडून १४ वा वित्त आयोगातून निधी दिला जातो. त्या निधीतून ग्रामपंचायतला पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या विजेचे बिले भरण्यापासून गावातील विकासकामेही करावी लागतात. ग्रामपंचायतच्या वाट्याला येणाऱ्या निधीतील काही रक्कम आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याच्या नावावर सरकार कंत्राटदार 'सीएसी' कंपनीला देते. संगणक परिचालकांचे मानधन दरमाह १२ हजार रुपये ठरविण्यात आले असून, त्यातील अर्धी रक्कम ग्रामपंचायत व अर्धी रक्कम कंपनीला द्यावी लागते. कंपनी त्यांच्या वाट्याची रक्कम संगणक परिचालकांना देत नाही. शिवाय आजपर्यंत १२ हजाराचे मानधनही मिळाले नाही.