शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

संगणक परिचालक नव्हे, तर वेठबिगारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:20 IST

राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देखदखद : मानधन रखडल्याने ६३ परिचालकांची उपजीविका ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही. त्यांना मानधन देण्याची जबाबदारी ना तर सरकार स्विकारत आहे, ना संबंधित कंपनी; परिणामी, या परिचालकांची सेवा ही सरकार व कंपनीसाठी केवळ वेठबिगार ठरत असल्याची खदखद संतप्त परिचालकानी लोकमतजवळ व्यक्त ेकेली आहे.राज्य सरकारने देवळी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन संगणक परिचालकांची नियुक्ती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे असभ्य वर्तन आणि अनियमीत मिळणारे मानधन, यामुळे काही संगणक परिचालकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. देवळी तालुक्यातील ६३ परिचालक कार्यरत असून, काहींवर दोन केंद्रांचा कार्यभार सोपविला आहे. वर्षभरापासून मानधनाचा एक पैसाही मिळाला नाही. त्यामुळे कुटूंबाची उपजीविका कशी करायची, असा प्रश्न अनेक संगणक परिचालकांना पडला आहे.राज्य शासनाने मनरेगातंर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा दर २०३ रुपये प्रती दिवस ठरविला. मात्र सुशिक्षित संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीही केले नाही. मानधन मिळत नसल्याने काहींनी कामे सोडली तर काहींनी गावतच मजुरीची कामे करायला सुरुवात केली. राज्य शासनाने ही केंद्र चालविण्याचा कंत्राट 'सीएसी' (कन्व्हरन्स सर्व्हिसेस इंडिया लिमेटेड ) नामक कंपनीला दिला आहे. पूर्वी हा कंत्राट दुसऱ्या कंपनीकडे होते. कंत्राटदार कंपनी बदलली तरी संगणक परिचालकांच्या समस्या सुटल्या नाही. काही परिचालकांना पदरमोड करुन इंटरनेटची बिले भरावी लागत आहे. काहींना ग्राम पंचायतीचे कामे'सायबर कॅफे' मधून करवून आणावी लागतात. त्यासाठीचा खर्च स्वत: करावा लागतो. हा प्रकार अधिकारी, पदधिकारी व लोकप्रतिनींधीना माहिती असूनही ते केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे.शासकीय निधीवर डल्लाप्रत्येक ग्रामपंचायतला लोकसंख्येच्या आधारावर सरकारकडून १४ वा वित्त आयोगातून निधी दिला जातो. त्या निधीतून ग्रामपंचायतला पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या विजेचे बिले भरण्यापासून गावातील विकासकामेही करावी लागतात. ग्रामपंचायतच्या वाट्याला येणाऱ्या निधीतील काही रक्कम आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याच्या नावावर सरकार कंत्राटदार 'सीएसी' कंपनीला देते. संगणक परिचालकांचे मानधन दरमाह १२ हजार रुपये ठरविण्यात आले असून, त्यातील अर्धी रक्कम ग्रामपंचायत व अर्धी रक्कम कंपनीला द्यावी लागते. कंपनी त्यांच्या वाट्याची रक्कम संगणक परिचालकांना देत नाही. शिवाय आजपर्यंत १२ हजाराचे मानधनही मिळाले नाही.