शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भटक्या विमुक्त जाती अन्नसुरक्षेपासून वंचित

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय

वायगाव (नि.) : प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकाना मिळणे गरजेचे असतानाही बहुतांश भटक्या जाती जमातीच्या लोकांकडे शिधापत्रिका नसल्याने ते अन्न सुरक्षेपासून वंचित ंआहेत.भटक्या समाजातील बंजारा, गोसावी, गाडी लोहार, गोपाळा, नाथजोगी, बहुरूपी, गवळी, नदीवाले, लोहार, भाविष्य सांगणारे, झाडपत्ती विकणारे, गारूडी अशा अनेक भटक्या समाजातील नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून नाईलाजाने दूर राहावे लागले. भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार्‍या सोई-सुविधा आणि सवलती, आरोग्य सुविधापासून हे समाज वंचित आहे.  ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्याना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे शक्य नसल्याने त्यांचा नाईलाज आहे. भटक्या समाजातील नागरिकांची स्थिती ही अतिशय वाईट आहे. सतत भटकत असल्याने त्यांना सहन शिधापत्रिका मिळत नाही. तसेच हे नागरिक शिधापत्रिका बनविण्यासाठी गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी परत पाठविले जाते. परिस्थिती हलाखीची असल्याने अशा जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिलणे अत्यावश्यक आहे. शासनाने अशा गरीब लोकांसाठीच ही योजना सुरू  केली आहे. परंतु त्यांनाच मुलभूत हक्कापासून दूर रहावे लागत असल्याने शासनाच्या या योजनेचा मूळ हेतूच दूर सारला जात आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देवून भटक्या जातीच्या नागरिकांना योजनेचा लाभ व मुलाना शिक्षणासाठी उपाय म्हणून सर्वप्रथम त्यांच्या शिधापत्रिका बनविणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)