शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

अपात्र कर्जप्रकरणांची नोडल अधिकारी करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसार पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे थेट बँकांना पुरविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देपीककर्जासाठी पालकमंत्र्यांचा नवा पॅटर्न : खरीप पीककर्जाचा टक्का वाढविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये यावर्षी साडेचार लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, खरिपाकरिता पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अर्धाअधिक हंगाम संपत आला तरीही जिल्ह्यामध्ये केवळ ४७.०८ टक्केच कर्जवाटप झाल्याने जिल्ह्यातील एकही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये म्हणून बँकांनी अपात्र ठरविलेल्या पीककर्ज प्रकरणांची नोडल अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय अधिकाºयांनी कार्यवाही सुरू केली आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही पीककर्ज वाटपाचा टक्का फारच अल्प होता. कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसार पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे थेट बँकांना पुरविण्याचा निर्णय घेतला.सोबतच पालकमंत्र्यांनीही काही तालुक्यातील बँकांना भेटी देऊन माहिती जाणून घेत सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. सर्वाधिक कापूस खरेदी करुन राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले. तसेच पीककर्ज वाटपातही जिल्हा राज्यात प्रथम आणावा, अशा सूचना केल्याने प्रशासकीय यंत्रणाही आता जोमाने कामाला लागली आहे.नोडल अधिकारी म्हणून यांची नियुक्तीतालुकास्तरावर तहसील, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे. बँकांनी अपात्र ठरविलेल्या पीककर्ज प्रकरणांची यादी बँकांकडून प्राप्त करून प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने त्यांना नेमून दिलेल्या बँक शाखांना भेटी द्यायच्या आहेत. बँकांनी त्रोटक कारणाने कर्जप्रकरणे अपात्र ठरविल्यास त्र्युट्या पूर्ण करण्यास सांगणे तसेच शेतकऱ्यावरील इतर कर्जामुळे पीककर्ज प्रकरणे अपात्र ठरविली असल्यास ओटीएसमध्ये स्थानांतरण करून पीककर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना देण्याची जबाबदारी सोपविली आहे.कर्जमुक्ती योजनेचीही घेताहेत माहितीशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात ९० हजार ६६५ शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली. मात्र, अपात्र ठरलेल्या ४३ हजार ८२७ शेतकरी तसेच यादीत नाव न आलेले ६ हजार ६१ अशा एकूण ४९ हजार ८८८ शेतकरी खात्यांची तालुकानिहाय माहिती नोडल अधिकाऱ्यांनी बँक भेटीदरम्यान प्राप्त करून घ्यावी. तसेच ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांचीसुद्धा तपासणी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक