लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मार्च महिन्यातच अण्णा सागरात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी सेवाग्रामवर पाणीटंचाईचे संकट राहण्याची चिन्ह आहेत. शासनाने जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमि संधारण अभियान अंतर्गत गाव तलाव पुनर्जीवनाचे काम केले. यात तलावाचे खोलीकरण आणि दगडाची बांधणी केली. पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवण्यात आले. यातून १२०.८८ सघमी जलसाठा क्षमता तयार झाला.या तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे. या तलावात सुरूवाती पासूनच मोठ्या प्रमाणवर जल संचय आणि वाहणारे पाणी यात येत असल्याने संचय चांगला होतो. जवळच पाणी पुरवठा करणारी विहीर आणि जवळच शेती असल्याने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. मात्र यंदा आताच तलाव कोरडा झाल्याने शेती सिंचन व पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
अण्णासागर तलावात पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST
तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे.
अण्णासागर तलावात पाण्याचा ठणठणाट
ठळक मुद्देलाखो रूपये खर्चून केले खोलीकरण : फेब्रुवारी महिन्यातच तलाव झाला कोरडा