शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Shakuntala Railway : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पत्राला रेल्वे मंत्रालयाकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 13:22 IST

विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्दे'शकुंतला' रेल्वे अद्यापही बंदच बंद गाड्या सुरू करण्यासाठी वीस वर्षांपासून लढा

फनिंद्र रघाटाटे

रोहना (वर्धा) : विदर्भातील इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वे गाडी मागील अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहेत. या नॅरोगेज रेल्वेलाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करावी, यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविले. पण, अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याने त्यांच्या पत्रालाही रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.

विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या मार्गांवरून त्या धावत होत्या; परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. या सर्व गाड्या ब्रॉडगेजमध्ये बदलवून आणि या मार्गांचा विस्तार सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान भाजपने या बंद गाड्या सुरू करू, असे आश्वासन दिले होते; पण निवडणूक झाल्यानंतर पक्षाने आणि सरकारनेही त्याकडे लक्ष दिले नाही. केंद्रातील भाजपची दुसरी टर्म सुरू असून, सध्या रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळेच ही रेल्वे सुरू व्हावी, याकरिता आग्रही असलेल्या रोहना येथील रेल्वेमुक्ती व विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगितली. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पत्राद्वारे मागणी केली; पण अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

या रेल्वे मार्गावर भारत सरकारचा ताबा

तिन्ही रेल्वे गाड्या सन २०१६ ला इंग्रज सरकारच्या मालकीतून मुक्त झाल्या व आता या मार्गावर भारत सरकारचा पूर्ण ताबा असल्याची बाबही शासनाच्या लक्षात आणून दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पटल्याने त्यांनी लगेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून यवतमाळ ते अचलपूर ही रेल्वेगाडी बैतुलपर्यंत पुढे नेऊन, आर्वी- पुलगाव ही तिवसा-चांदूरपर्यंत वाढवून व नागभीड ते ब्रह्मपुरीला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी केली. आता पत्र पाठवून चार महिन्यांचा कालावधी लोटला, दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. तरीही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे या प्रश्नासंदर्भात शासन उदासीन असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Governmentसरकारrailwayरेल्वेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShakuntala Trainशकुंतला रेल्वे