शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गॅसही नाही अन् रॉकेलही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM

रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही.

ठळक मुद्देउज्ज्वला योजनेचा उद्देशच बाजूला : रेशनकार्डावरील रॉकेल देण्याची मागणी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोरगरिबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहे. परिणामी, नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले. पण, गॅस भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरिबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागत आहे. त्यामुळे योजनेचा मुळ उद्देशच बाजूला पडला आहे. त्यामुळे गॅसही नाही, अन् रॉकेलही नाही, अशी अवस्था झाली आहे. केरोसीनमुक्तीच्या नादात वर्धा जिल्ह्यातील केरोसीनचा पुरवठा निम्म्याहून अधिक घटविण्यात आल्याने रेशनकार्डावरील रॉकेल पुन्हा देण्याची मागणी गरीबांकडून होत आहे.रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि झोपडपटी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, जेवण करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो. किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण, रॉकेल मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.२००९ पासून रॉकेल बंदरेशनकार्डावरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला ५ ते २४ लिटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण, २००९ पासून हे रॉकेल बंद केले आहे. १ गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लिटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण, हे बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहे.‘उज्ज्वला’मुळे ४८ हजार कुटुंबे गॅसधारकजिल्ह्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणानुसार २०१६ मध्ये सुरू झाली. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे ४८ हजार उज्ज्वला योजनेतील कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वलाचा गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला पाच ते सहा सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे पुन्हा ते चूल अथवा स्टोव्हचा वापर करतात. उज्ज्वलाच्या नव्या गॅस जोडण्याही दोन वर्षांपासून बंद आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजना