शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

मतदारसंघात ना भूमिपूजन ना पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:54 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधींची गोची : वर्ध्यासह हिंगणघाट मतदारसंघाला सर्वाधिक झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आता ना भूमिपूजन होणार ना पायभरणी. वर्धा आणि हिंगणघात या दोन मतदार संघातील सर्वाधिक ग्रामंपचायतीच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेची या मतदार संघाला झळ बसली असून लोकप्रतिनिधींची गोचीच झाली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता असल्याने वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील वर्धा व हिंगणघाट मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर आर्वी व देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय खासदारही भाजपाचे आहे. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटने व पायाभरणीचा धडाका लावा, अशा सूचना दिल्या आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपासून लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात २४ मार्चला २९८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होऊ घातल्याने या निवडणुकीची २० फेब्रुवारीपासूनच सर्वत्र आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिपूजन व पायभरणी कार्यक्रमावर विरजण पडले आहे. परिणामी लोकप्रतिनिधींचीही अडचण वाढली आहे. विशेषत: वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच आमदार असताना याच मतदार संघातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथील लोकप्रतिनिधींना आता ना भूमिपूजन ना पायाभरणी करता येणार असल्याने गोची झाली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या मतदारसंघात आता निवडणुकीपूर्वी कोणतीही विकासकामे करता येणार नाही.बॅकडेटचा फंडा ठरतोय मदतगारग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन व लोकार्पणाला ब्रेक लागला आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही आणि नवीन कामाचे कार्यारंभ आदेशही देता येत नाही. असे असले तरी काहींनी आपल्या मतदार संघातील किंवा महत्वाच्या ग्रामपंचायतीमधील कामाचे बँकडेटमध्ये कार्यारंभ काढण्याचाही खटाटोप चालविला आहे. त्यामुळे त्या कामांचे भूमिपूजन करता येणार आहे. परंतु, या गडबडघाईत अनेक कामांच्या दिशा व स्थानही चुकल्याचे बोलेल्या जात आहे. असे असताना आता या कामाचे लोकप्रतिनिधी भूमिपूजन करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुकावर्धा शहरालगतच्या दहा ग्रामपंचायती या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून वर्धा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीवर परिणाम कारक ठरतात. या दहा ग्रामपंचायतीपैकी पिपरी (मेघे) ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामे करण्यासाठी आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसहिंता लागणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने आता या परिसरात विकासात्मक कामे नव्याने करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या विकास कामांवरच नागरिकांना समाधान मानावे लागेल.