शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

मतदारसंघात ना भूमिपूजन ना पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:54 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधींची गोची : वर्ध्यासह हिंगणघाट मतदारसंघाला सर्वाधिक झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आता ना भूमिपूजन होणार ना पायभरणी. वर्धा आणि हिंगणघात या दोन मतदार संघातील सर्वाधिक ग्रामंपचायतीच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेची या मतदार संघाला झळ बसली असून लोकप्रतिनिधींची गोचीच झाली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता असल्याने वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील वर्धा व हिंगणघाट मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर आर्वी व देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय खासदारही भाजपाचे आहे. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटने व पायाभरणीचा धडाका लावा, अशा सूचना दिल्या आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपासून लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात २४ मार्चला २९८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होऊ घातल्याने या निवडणुकीची २० फेब्रुवारीपासूनच सर्वत्र आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिपूजन व पायभरणी कार्यक्रमावर विरजण पडले आहे. परिणामी लोकप्रतिनिधींचीही अडचण वाढली आहे. विशेषत: वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच आमदार असताना याच मतदार संघातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथील लोकप्रतिनिधींना आता ना भूमिपूजन ना पायाभरणी करता येणार असल्याने गोची झाली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या मतदारसंघात आता निवडणुकीपूर्वी कोणतीही विकासकामे करता येणार नाही.बॅकडेटचा फंडा ठरतोय मदतगारग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन व लोकार्पणाला ब्रेक लागला आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही आणि नवीन कामाचे कार्यारंभ आदेशही देता येत नाही. असे असले तरी काहींनी आपल्या मतदार संघातील किंवा महत्वाच्या ग्रामपंचायतीमधील कामाचे बँकडेटमध्ये कार्यारंभ काढण्याचाही खटाटोप चालविला आहे. त्यामुळे त्या कामांचे भूमिपूजन करता येणार आहे. परंतु, या गडबडघाईत अनेक कामांच्या दिशा व स्थानही चुकल्याचे बोलेल्या जात आहे. असे असताना आता या कामाचे लोकप्रतिनिधी भूमिपूजन करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुकावर्धा शहरालगतच्या दहा ग्रामपंचायती या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून वर्धा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीवर परिणाम कारक ठरतात. या दहा ग्रामपंचायतीपैकी पिपरी (मेघे) ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामे करण्यासाठी आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसहिंता लागणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने आता या परिसरात विकासात्मक कामे नव्याने करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या विकास कामांवरच नागरिकांना समाधान मानावे लागेल.