शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघात ना भूमिपूजन ना पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:54 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधींची गोची : वर्ध्यासह हिंगणघाट मतदारसंघाला सर्वाधिक झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आता ना भूमिपूजन होणार ना पायभरणी. वर्धा आणि हिंगणघात या दोन मतदार संघातील सर्वाधिक ग्रामंपचायतीच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेची या मतदार संघाला झळ बसली असून लोकप्रतिनिधींची गोचीच झाली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता असल्याने वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील वर्धा व हिंगणघाट मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर आर्वी व देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय खासदारही भाजपाचे आहे. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटने व पायाभरणीचा धडाका लावा, अशा सूचना दिल्या आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपासून लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात २४ मार्चला २९८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होऊ घातल्याने या निवडणुकीची २० फेब्रुवारीपासूनच सर्वत्र आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिपूजन व पायभरणी कार्यक्रमावर विरजण पडले आहे. परिणामी लोकप्रतिनिधींचीही अडचण वाढली आहे. विशेषत: वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच आमदार असताना याच मतदार संघातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथील लोकप्रतिनिधींना आता ना भूमिपूजन ना पायाभरणी करता येणार असल्याने गोची झाली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या मतदारसंघात आता निवडणुकीपूर्वी कोणतीही विकासकामे करता येणार नाही.बॅकडेटचा फंडा ठरतोय मदतगारग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन व लोकार्पणाला ब्रेक लागला आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही आणि नवीन कामाचे कार्यारंभ आदेशही देता येत नाही. असे असले तरी काहींनी आपल्या मतदार संघातील किंवा महत्वाच्या ग्रामपंचायतीमधील कामाचे बँकडेटमध्ये कार्यारंभ काढण्याचाही खटाटोप चालविला आहे. त्यामुळे त्या कामांचे भूमिपूजन करता येणार आहे. परंतु, या गडबडघाईत अनेक कामांच्या दिशा व स्थानही चुकल्याचे बोलेल्या जात आहे. असे असताना आता या कामाचे लोकप्रतिनिधी भूमिपूजन करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुकावर्धा शहरालगतच्या दहा ग्रामपंचायती या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून वर्धा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीवर परिणाम कारक ठरतात. या दहा ग्रामपंचायतीपैकी पिपरी (मेघे) ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामे करण्यासाठी आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसहिंता लागणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने आता या परिसरात विकासात्मक कामे नव्याने करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या विकास कामांवरच नागरिकांना समाधान मानावे लागेल.