शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

निर्मल भारत अभियान शहरांपासून दूरच

By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST

शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी

वर्धा : शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी आलेच नाही़ यामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरे या अभियानापासून कोसोदूर आहे़ अनेक शहरांत उघड्यावरच शौचविधी उरकला जात असल्याने अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील दयालकृष्ण मार्केटच्या बाजूला लाडे यांच्या खाली जागेसमोर मुख्य रस्त्यावर दिवसरात्र हागणदारी सुरू असते. येथे कचऱ्याचा ढिगारा पडलेला असतो. या प्रकारामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या ठिकाणी सतत वराहांचा सुळसुळाट असतो. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़ या भागातील नागरिक व व्यावसायिक घाण, दुर्गंधी व उघड्यावर उरकण्यात येणाऱ्या शौचविधीमुळे त्रस्त झाले आहेत़ पादचारी येथून नाक मुठीत धरून आवागमन करतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक व व्यावसायिय यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास व अन्य विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कधीही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ पालिका प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे़वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. देश, विदेशातील पर्यटक या शहराला भेट देतात़ महात्मा गांधी व विनोबांच्या या पावन भूमीत अस्वच्छता, झोपडपट्टीतील नागरिक उघड्यावर शौचविधी उरकत असेल तर ती लांच्छणात्मक बाब म्हणावी लागेल़ हा प्रकार केवळ वर्धा शहरातच नव्हे तर पुलगाव, आर्वी, देवळी, सिंदी (रेल्वे) यासह अन्य शहरांतही दिसतो़ स्थानिक व जिल्हा प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)