शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

नऊ महिन्यांत १८ मुलींचे झाले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह मोपेड, मोटरसायकल असे काही कमी पडू देत नाहीत. मुले नेमकी मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त राहतात. ती कोणत्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत आहे. याकडे मात्र, पालकांचे होणारे दुर्लक्ष हेच मुली पळून जाण्याचे अथवा पळवून नेण्याचे कारण समोर आले आहे.

ठळक मुद्देअज्ञानपणात प्रेमप्रकरणातून घटना : लॉकडाऊन ठरले पालकांसाठी डोकेदुखी

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : साहेब थोड नाजूक प्रकरण आहे...आमच्या मुलीला फूस लावून पळवून नेले...तिला अजून काही समजत नाही...प्लीज तिला शोधून काढा...अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या लॉकडाऊन काळातही कमी झालेली नाही. नऊ महिन्यांत १८ हून अधिक मुली पळून गेल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे.आज कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह मोपेड, मोटरसायकल असे काही कमी पडू देत नाहीत. मुले नेमकी मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त राहतात. ती कोणत्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत आहे. याकडे मात्र, पालकांचे होणारे दुर्लक्ष हेच मुली पळून जाण्याचे अथवा पळवून नेण्याचे कारण समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मुली पळून जाण्याच्या तपासात जर मुलगी अल्पवयीन असेल तर थेट अपहरण अशी नोंद होते. त्यानुसार तिचा शोध घेतला जातो. ज्याने हे कृत्य केले त्याच्यावर ह्यपोक्सोह्ण अंतर्गत कारवाई केली जाते. पळून गेलेल्या बहुतांशी मुली या सज्ञान होण्याच्या उंबरठ्यावर असतात. सज्ञान झाल्यानंतर त्या लग्न करुनच थेट पोलीस ठाण्यात हजर होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचे संकट सुरु झाले तसा लॉकडाऊन लागू झाला. प्रत्येक कुटुंब घरातच होते. तरीही त्या कुटुंबातील मुलीला पळवून नेणे अथवा ती पळून जाण्याचे प्रमाण मात्र, काही थांबले नाही. हे पोलीस ठाण्यांतील नोंदीवरुन स्पष्ट झाले. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने दामिनी पथकाकडून होणारे समुपदेशनही सध्या थांबले आहे.१३ ते २५ वयोगटातील मुलींचे प्रमाण जास्तपोलीस सुत्रांनुसार, १३ ते २५ वयोगटातील मुली पळून जाण्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यात दररोज दाखल होतात. यात ७० टक्के मुली या अल्पवयीन असून प्रियकरासोबत त्या पळून गेल्याची माहिती समोर येते. मुलगी वयात येत असतानाच तिला वेगवेगळी आमिषे दाखवून प्रेमाच्या जाळयात ओढले जाते. त्यांना पळून जाऊन लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे पळून जाण्यात अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे.मुलींचा शोध सुरुजिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दररोज अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या नोंदी होतात. यापैकी काही मुलींना परत आणण्यात यश मिळाले तर आजघडीला तब्बल १८ मुली अजूनही मिळालेल्या नाही. त्यामुळे पुन्हा ऑपरेशन मुस्कान राबविण्याची गरज आहे. लॉकडाउन काळात हे अभियान थांबले आहे. बेपत्ता असलेल्या मुलींचा शोध त्या त्या ठाण्यातील शोध पथकाकडून सुरु आहे.पालकांनी सुसंवादातून मुलांचे मित्र बनावे. चांगल्या-वाईट गोष्टीची त्यांना जाण करुन द्यावी. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींचा भडीमार न करता त्यांच्या प्रात्येक समस्या समजून घ्याव्या.-मेघाली गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा सेल.

टॅग्स :Policeपोलिस