शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

४८ तासात ४५० व्यक्तींना सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:39 PM

परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियान : वाहतूक नियंत्रण शाखेचा ‘लोकसहभागतून हेल्मेट वापर’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. सदर अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर ४८ तासात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सुमारे ४५० वाहनचालकांना यापुढे हेल्मेटचा वापर करावा अशा आशयाचे सूचनापत्र वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती यापूढे हेल्मेटचा वापर न करताना आढल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न केल्याने विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे. त्यामुळे न्यायालयानेही याची दखल घेत सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीने योग्य पावले संबंधित प्रशासनाने उचलावित, अशा सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून हेल्मेट सक्ती नव्हे तर लोकसहभागातून हेल्मेटचा वापर हा अभिनव उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने २३ एप्रिलपासून हाती घेतला आहे. हा उपक्रम राबविताना कर्तव्य बजाविणारे प्रत्येक वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेटचा वापर न करणाºया व्यक्तीला सुरूवातीला सूचनापत्र देणार आहेत. हेल्मेटचा वापर न करणाºयांना वाहतूक पोलिसांकडून ७ मे रस्ता सुरक्षा पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमापर्यंत सूचनापत्र दिले जाणार असले तरी पुर्वी ज्यांना सूचना पत्र देण्यात आले; पण त्यानंतरही ते वाहनचालविताना हेल्मेटचा वापर न करताना आढळून आले अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गत दोन दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने हेल्मेटचा वापर न करणाºया सुमारे ४५० वाहनचालकांना सूचनापत्र देण्यात आले आहे. तर याच कालावधीत कुणालाही हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.हेल्मेटमुळे वाचले दुग्ध व्यावसायिकाचे प्राणभरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुग्ध व्यावसायीक सुधाकर काकडे रा. सुसुंद हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजता वर्धा-आर्वी मार्गावरील जुना पाणी चौकात झाला. दुचाकीचालक काकडे हे वाहनचालविताना हेल्मेट घालून असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. हेल्मेटमुळेच पुढील अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.नागरिकांनी सुरक्षीत प्रवास या हेतूने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त केल्यानंतर अनेक ठिकाणी हेल्मेटची विक्री होताना दिसते. कुठल्या कंपनीचे हेल्मेट आहे हे बघण्यापेक्षा ते आयएसआय मार्क आहे काय याची चाचपडताळणी करूनच हेल्मेटची खरेदी करावी.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.