शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

नव्यानेच बांधलेला पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:23 PM

कंत्राटदार आणि जि. प. बांधकाम विभागाच्या गैरप्रकारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी डोक्यावरुन सोयाबीनची पोती व कापसाचे गाठोडे नेत आहे. तरीही संबंधित कंत्राटदार व अभियंत्याला जाग आली नाही. पुलाची दुरुस्ती करण्याबाबतचे आश्वासन कंत्राटदाराने संबंधित शेतकऱ्याला दिले.

ठळक मुद्देबांधकामाला झाला एक महिना। रामपूर ते पिपळधरी वहिवाट ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : नजीकच्या रामपूर ते पिपळधरी या रस्त्यावरील नाल्यावर मे ते जून महिन्यात लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेअंतर्गत मोठा पूल उभारन्यात आला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांची मागील पन्नास वर्षांपासून बंद असलेली वहिवाट सुरळीत झाली. मात्र, जून महिन्यातील पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुलाचे तातडीने नव्याने बांधकाम करण्यात यावेश अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आर्वी येथील कंत्राटदार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी पुलाच्या बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. परिणामी, अवघ्या एका महिन्यातच नव्याने बांधलेला पूल जून महिन्यात झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांची परत वहिवाट बंद झाली आहे. पुलाअभावी शेतातील काढणीला आलेला शेतमाल या रस्त्याअभावी शेतातच पडून असल्याने खराब होत आहे.कंत्राटदार आणि जि. प. बांधकाम विभागाच्या गैरप्रकारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी डोक्यावरुन सोयाबीनची पोती व कापसाचे गाठोडे नेत आहे. तरीही संबंधित कंत्राटदार व अभियंत्याला जाग आली नाही. पुलाची दुरुस्ती करण्याबाबतचे आश्वासन कंत्राटदाराने संबंधित शेतकऱ्याला दिले. आता मात्र, कंत्राटदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करीत या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.