शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ईएमओच्या दुर्लक्षाने नवजात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:19 IST

येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला.

ठळक मुद्देरुग्णवाहिका न थांबविता धरला पुढचा मार्ग : आरोग्य उपकेंद्रात कुटुुुंंबीयांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला. परिणामी वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून कुटूबींयानी उपआरोग्य केंद्रात आक्रोश करुन संताप व्यक्त केला.आकोलीच्या गोसावी नगरातील जयवंता रवि माईंदे या गरोदर मातेला प्रसुतीसाठी सकाळी पावणे दहा वाजता आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी उपकेंद्रात मसाळा लघू आरोग्य केंद्राच्या परिचारिका अर्चना बावणे, आशा वर्कर नम्रता खैरकार व अंगणवाडी सेविका संगीता पिंपळे उपस्थित होत्या. गरोदर मातची प्रकृती बघता परिचारिका बावणे यांनी १०८ क्रमांकावर फोन करुन तातडीने रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. काही वेळाने उपआरोग्य केंद्राजवळ रुग्णवाहिका पोहचली.पण, रुग्णवाहिकेतील ईएमओने येथील रुग्णाच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करीत कन्नमवारग्रामला जाणे खूप महत्वाचे आहे ,असे सांगून रुग्णवाहिका पुढे दामटली. त्यामुळे पुन्हा परिचारिका बावणे यांनी १०८ वर संपर्क साधून दुसरी रुग्णवाहिका बोलावली. त्यानुसार रुग्णवाहिका पोहोचलीही परंतू तोपर्यंत स्त्री लिंगी बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मातेवर उपचार होणे गरजेचे असताना नातेवाईकांनी एकच गोंधळ घातल्याने उपचारात अडचणी येऊ लागल्या. संतप्त नातेवाईकांनी टेबलवरील साहित्याची फेकाफेक सुरू केली. मातेचा विचार करुन उपस्थित सोमनाथ सोळंकी, अरविंद काकडे, मधुकर देवढे, दिलीप बेनपे, लालगिर भुराणी यांनी कुटुंबीय व समाजातील महिला,पुरुषांची समजूत काढली. तेव्हा जमाव शांत झाल्याने मातेला पुढील उपचाराकरिता सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.नातेवाईकांच्या मागणीनुसार बाळाचे शवविच्छेदन केले. त्यावरुन बाळाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मातेवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.घरीच बाळंतपण करण्याची मानसिकता बदलण्याची गरजआकोली आरोग्य उपकेद्राच्या कार्यक्षेत्रात पारधी, बेलदार आणि गोसावी समाजाची संख्या लक्षणीय आहे. आजही त्यांचा कल घरीच बाळंतपण करण्याकडे असतो. रुग्णाला अगदी वेळेवर दवाखाना व उपकें द्रात आणतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही धावपळ होत असल्याने या समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.येथील आरोग्य सेविका सयाम यांना निलंबित केल्यानंतर त्यांचा पदभार कुणाकडेही सोपविण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णांच्या सेवेचा विचार करून त्यांचा प्रभार सोपविण्याची गरज व्यक्त होत असल्याने वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू