शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:43 IST

तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त काकडदरा ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

ठळक मुद्देग्रामस्थांची खंत : श्रीकृष्णदास जाजू स्मृती कार्यक्रमात साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त काकडदरा ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी काकडदरा गाव पाणीदार झाले असले तरी या गावाच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. लोकप्रतिनिधींकडे आजपर्यंत पाठपुरावा करण्यात आला; पण आश्वासनाच्या पलीकडे ग्रामस्थांच्या पदरात काहीही पडले नसल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना काकडदरा गावात पहिल्यांदा जलसंधारणाचे काम सुरू करणारे मधुकर खडसे यांनी काकडदरा गाव पाणीदार ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या गावातील ग्रामस्थांच्या परिश्रमाचे हे फळ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या गावातील नागरिकांनी फार पूर्वीपासून श्रमदानाची कास धरली, असे ते म्हणाले. यावेळी सुरुवातीच्या काळात असेफाच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत रेखा मोरे यांनी आपल्या सासºयांनी ५०० एकर जमिनीपैकी १०० एकर जमीन या गावात सध्या वास्तव्य असलेल्या लोकांना दिली. काकडदरा गावातील कोलाम समाजाच्या लोकांनी त्यावेळी चांगल्या पद्धतीने काम केले. खडसे व मोरे यांना त्यावेळी लोक देवदूत मानत होते व जमिनदाराप्रतिही ग्रामस्थांची सद्भावना होती, असा गौरवपूर्ण उल्लेख केला.काकडदरा गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत महाराष्टÑात प्रथम क्रमांक पटकाविला असला तरी या गावात जलसंधारणाचे काम हे १९८६ मध्येच सुरू झाले होते. त्यावेळी मधुकर खडसे यांच्या मार्गदर्शनात घनश्याम भिमटे यांनी गावात राहून लोकांना या कामासाठी प्रोत्साहित केले व गावाला आदर्श बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. घनश्याम भिमटे यांनी या गावाच्या पूर्व इतिहासावर प्रकाश टाकला. गावाने शिक्षणात प्रगती साधली आहे. पाणीदार गावात अनेक चांगल्या गोष्टी निर्माण झाल्यात, असेही ते म्हणाले. सुरुवातीला पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक डॉ. उल्हास जाजू यांनी केले. त्यांनी काकडदरा गावातील काम करणाºया सर्वांचा परिचय करून दिला.यावेळी मंदार देशपांडे यांनी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना प्रशिक्षण देण्यात आले होते. काकडदराच्या या यशात महिलांचा सहभाग सर्वाधिक राहिला. दररोज ८० महिला श्रमदान करीत होत्या. काहींना शासनाच्या रोहयोतून मजुरी देण्यात आली; पण ही मजुरी कमी होती. तरीही लोकांनी श्रमदान केले, अशी माहिती त्यांनी दिली. काकडदराने हे यश मिळविले असले तरी सालदरा-काकडदरा या गावांना जोडणाºया पांदण रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही. एका बाजूचे काम आता सुरू झाले आहे. गावात आरोग्य केंद्र नाही. शिवाय दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी शाळा नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासोबतच गावातील तरुणांना शिक्षणाकडे वळविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेला मधुकर खडसे, सुधा खडसे, दौलत घोरनाडे, शंकर आमिलकंठवार, मुख्याध्यापक विकास वाटकर, प्रकाश रामगडे, ज्ञानेश्वर चोरामले, गणेश रामगडे, ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मुंडेकार, प्रफुल्ल दाभेकर, चंद्रशेखर सयाम, दर्शन टेकाम, माजी सरपंच बेबी कुरझडकर, सुनीता दाभेकर, घनश्याम भिमटे, रेखा मोरे, पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे, भूषण कडू, कुणाल परदेशी, चिन्मय फुटाणे यांच्यासह डॉ. उल्हास जाजू, डॉ. सुहास जाजू व जाजू परिवारातील मान्यवर उपस्थित होते.बक्षिसाची रक्कम अद्यापही अप्राप्तकाकडदरा गावाला वॉटर कप स्पर्धेत ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला असला तरी या पुरस्काराची रक्कम अद्याप ग्रामसभेला मिळालेली नाही. ग्रामसभेच्या नावाचे पॅन कार्ड तयार करण्यात न आल्याने रक्कम मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामस्थांच्यावतीने गावातील कामाची चित्रफित तयार करून आमिर खान यांना पाठविण्यात आली आहे. त्यांना काकडदरा येथे येण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.दहा वर्षांपूर्वी सुरू केले होते कामगावच्या माजी सरपंच बेबीताई कुरझडकर यांनी आपण सरपंच पदावर असताना गावातील विहिरीवर दोन मोटारी बसविल्या होत्या. तसेच दोन स्टार्टरही खरेदी केले होते. त्यावेळीही जलसंधारणाचे काम करण्यात आले. २०१३ मध्ये अतिवृष्टी झाल्याने त्यापूर्वी झालेले सर्व काम वाहून गेले व आता वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वाहून गेलेले काम नव्याने तयार करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.गावातील प्रकाश रामगडे यांनी गावाने वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक मिळविले असले तरी पुढील काळात गावात पाणलोटची कामे सुरूच राहणार आहे. सेंद्रीय शेतीवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक विकास वाटकर यांनी सहाव्या वर्गासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले.